किमान तापमान : 28.64° C
कमाल तापमान : 29.54° C
तापमान विवरण : clear sky
आद्रता : 72 %
वायू वेग : 5.22 Mps
स्थळ : Mumbai, IN
29.54° C
28.14°C - 31.22°C
sky is clear28.47°C - 32.02°C
sky is clear28.87°C - 32.93°C
sky is clear29°C - 32.52°C
few clouds28.78°C - 32.42°C
sky is clear27.84°C - 30.17°C
sky is clear=गुजरात हायकोर्टाचा महत्त्वाचा निर्वाळा=
अहमदाबाद, [१९ मार्च] – मुलगा १८ वर्षांचा पूर्ण होईपर्यंतच त्याच्या पालनपोषणाची जबाबदारी आई-वडिलांवर असते, असा महत्त्वपूर्ण आणि दूरगामी परिणाम करणारा निर्वाळा गुजरात उच्च न्यायालयाने शुक्रवारी दिला.
मुलगा एकदा १८ वर्षांचा झाला आणि तो स्वत:च्या पायावर उभा राहिल्यानंतर आई-वडिलांची त्याच्याविषयीची जबाबदारी संपलेली असते. वयाची १८ वर्षे पूर्ण करणारा मुलगा शारीरिक किंवा मानसिक अपंग नसेल, तर त्याला दररोजच्या खर्चासाठी पैसे देणे माता-पित्यांना सीआरपीसीच्या कलम १२५ अंतर्गत मुळीच बंधनकारक नाही. मुलीच्या बाबतीत मात्र तसे नाही. मुलगी मोठी झाल्यानंतरही तिचा विवाह होईपर्यंत तिचा सांभाळ करण्याची जबाबदारी ही माता-पित्यांचीच असते, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
दिनेश ओझा असे नाव असलेले डॉक्टर आणि त्यांच्यापासून वेगळे राहणारी त्यांची पत्नी नीता यांचे हे प्रकरण आहे. नीता आपल्या अल्पवयीन मुलासह दिनेश यांच्यापासून वेगळी राहू लागली. तिने स्वत:साठी व मुलासाठी पतीकडून पोटगी मिळावी, यासाठी २००६ मध्ये मेहसाना येथील कौटुंबिक न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्याचवेळी दिनेश यांनीही नीतासोबत घटस्फोट घेण्यासाठी अर्ज सादर केला होता. न्यायालयाने दिनेश ओझा यांना पत्नी व मुलाला पोटगी देण्याचा आदेश दिला. पण, ऑक्टोबर २०१३ मध्ये त्यांनी मुलाची रक्कम देणे थांबविले. याविरोधात नीताने पुन्हा न्यायालयात धाव घेतली. तेव्हा, मुलगा आता १८ वर्षांचा झाला असल्याने, तो वडिलांकडून पोटगी घेण्यासाठी पात्र आहे काय, हे स्पष्ट होण्यासाठी त्यांना उच्च न्यायालयात जाण्याचा सल्ला कौटुंबिक न्यायालयाने दिला. दिनेश आणि नीता यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर उच्च न्यायालयाने उपरोक्त निर्वाळा दिला.