|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 06:01 | सूर्यास्त : 18:45
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 29.3° C

कमाल तापमान : 31.09° C

तापमान विवरण : clear sky

आद्रता : 52 %

वायू वेग : 4.88 Mps

स्थळ : Mumbai, IN

31.09° C

Weather Forecast for
Wednesday, 01 May

28.91°C - 32.92°C

sky is clear
Weather Forecast for
Thursday, 02 May

27.71°C - 31.33°C

few clouds
Weather Forecast for
Friday, 03 May

27.06°C - 30.14°C

sky is clear
Weather Forecast for
Saturday, 04 May

27.01°C - 30.12°C

sky is clear
Weather Forecast for
Sunday, 05 May

27.67°C - 30.9°C

sky is clear
Weather Forecast for
Monday, 06 May

28.08°C - 30.62°C

sky is clear
Home » राज्य, हिमाचल प्रदेश-उत्तराखंड » जोशीमठमधील ६५ टक्के घरे जमीनदोस्त

जोशीमठमधील ६५ टक्के घरे जमीनदोस्त

नवी दिल्ली, (२७ सप्टेंबर) – उत्तराखंडमधील तीर्थक्षेत्र जोशीमठमधील सुमारे ६५ टक्के घरे जमीनदोस्त झाली आहेत, असे सरकारी यंत्रणांच्या अहवालात म्हटले आहे. गत २ जानेवारीपासून जोशीमठ-औली रस्त्यालगत असलेल्या परिसरातील अनेक घरे व नागरी संरचनेत जमीन खचल्यामुळे मोठ्या भेगा पडू लागल्या. त्यामुळे ३५५ कुटुंबांचे स्थलांतर झाले. अनेक वर्षांपासून जमीन कमी झाल्याचे लक्षात आले होते; परंतु २ ते ८ जानेवारी या कालावधीत ते अधिक तीव‘ झाले.
३५ सदस्यीय पथकाने २२ ते २५ एप्रिल दरम्यान आपत्तीनंतरच्या नुकसानीचे मूल्यांकन केले. बाधित क्षेत्रांच्या दीर्घकालीन पुनर्प्राप्ती आणि पुनर्बांधणीसाठी लागणार्या आवश्यक मदतीचे मूल्यांकन या पथकाद्वारे करण्यात आले. या पथकामध्ये राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, संयुक्त राष्ट्र संस्था, सेंट्रल बिल्डिंग रिसर्च इन्स्टिट्यूट, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट व इतर सामाजिक संस्थेतील सदस्यांचा समावेश होता. जोशीमठमधील एकूण २,१५२ घरांपैकी १,४०३ घरे जमीन खचल्यामुळे बाधित झाली आहेत आणि याकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे, असे मूल्यांकन अहवालात म्हटले आहे.
एकूण ४७२ घरांची पुनर्बांधणी करणे आवश्यक आहे व ९३१ घरांची दुरुस्ती/रेट्रोफिट करणे आवश्यक आहे. अंशतः नुकसान झालेल्या घरांचे पुनर्बांधणी करणे आवश्यक आहे; जेणेकरून त्यांचे प्रतिकार वाढविण्यासाठी ‘चांगले मजबूत बनवा’ या तत्त्वांनुसार पुनर्रचना करणे आवश्यक आहे. जोशीमठमधील इमारतींचे नुकसान होण्याच्या मुख्य कारणांमध्ये कमकुवत बांधकाम साहित्याचा वापर, अपुरा मजबुतीकरण, संरचनात्मक त्रुटी व उंच उतारांवर इमारतींचे बांधकाम आदींचा समावेश आहे. विटा किंवा दगड एकत्र ठेवण्यासाठी कमकुवत माती-आधारित इमारती जमिनीवर पडून अधिक नुकसान झाले आहे, असे अहवालात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.

Posted by : | on : 27 Sep 2023
Filed under : राज्य, हिमाचल प्रदेश-उत्तराखंड
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g