किमान तापमान : 29.37° C
कमाल तापमान : 29.99° C
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 74 %
वायू वेग : 3.59 Mps
स्थळ : Mumbai, IN
29.99° C
28.67°C - 30.56°C
few clouds28.15°C - 30.49°C
sky is clear28°C - 30.33°C
sky is clear27.64°C - 29.82°C
sky is clear27.9°C - 30.46°C
sky is clear28.28°C - 30.44°C
broken clouds– गुजरात सरकारसोबत १३ हजार कोटींचा करार,
अहमदाबाद, (३ जून) – देशातील पहिला लिथियम-आयन बॅटरी बनवणारा प्रकल्प गुजरातमध्ये उभारण्यात येत आहे. यासाठी टाटा समूहाने गुजरात सरकारशी १३ हजार कोटींचा करार केला आहे. २०३० पर्यंत राज्यात ५० टक्के कार्बन उत्सर्जन मुक्त ऊर्जा आणि १०० टक्के इलेक्ट्रिक वाहने स्वीकारण्याचे लक्ष्य गुजरात सरकारने ठेवले आहे. हा प्रकल्प त्यासाठी पूरक असणार आहे. अग्रतास एनर्जी स्टोरेज सोल्युशन्सने शुक‘वारी राज्य सरकारसोबत नवीन इलेक्ट्रॉनिक धोरणाअंतर्गत एक सामंजस्य करार केला. मोठा कारखाना उभारण्यासाठी हा करार पाया ठरणार आहे. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेलही उपस्थित होते. अग्रतास एनर्जी ही टाटा समूहाच्या मालकीची कंपनी आहे.
२० गिगावॅट एवढी ऊर्जा तयार करण्याची या प्रकल्पाची क्षमता असेल. यासाठी सुमारे १३ हजार कोटींची गुंतवणूक करण्यात येणार आहे. गुजरातमध्ये बॅटरी उत्पादनाची परिसंस्था तयार करण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा ठरणार आहे, अशी माहिती सरकारने दिली. या प्रकल्पामुळे सुमारे १३ हजार व्यक्तींना नोकरी उपलब्ध होणार असल्याचे सांगितले जात आहे. गुजरात सरकारच्या सायन्स अॅण्ड टेक्नॉलॉजी विभागाचे सचिव विजय नेहरा आणि अग‘तास एनर्जीचे मुख्य कार्यकारी अधिकार राकेश रंजन या दोघांनी या करारावर स्वाक्षरी केली. या प्रकल्पासाठी सरकारचा संपूर्ण पाठिंबा राहील. प्रकल्प पूर्णपणे लिथियम-आयन सेल बनवण्यासाठी समर्पित असेल. ईव्ही बॅटर्यांच्या उत्पादनासाठी हा एक महत्त्वाचा घटक आहे, अशी माहिती मुख्यमंत्री पटेल यांनी दिली. सध्या भारतात चीन आणि कोरियामधून बॅटरी सेल आयात करण्यात येतात. मात्र, प्रकल्पाच्या स्थापनेनंतर गुजरात बॅटरी सेलच्या बाबतीत आत्मनिर्भर होईल.