किमान तापमान : 29.97° C
कमाल तापमान : 30.65° C
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 63 %
वायू वेग : 3.65 Mps
स्थळ : Mumbai, IN
30.65° C
28.04°C - 30.99°C
few clouds27.79°C - 30.46°C
sky is clear27.79°C - 30.02°C
few clouds27.76°C - 30.17°C
sky is clear28°C - 29.92°C
scattered clouds28.13°C - 30.82°C
broken clouds-योगी आदित्यनाथांनी मानले जनतेचे आभार,
लखनौ, (१४ मे) – उत्तरप्रदेशातील महानगर पालिका, नगर पालिका आणि नगर पंचायत अशा सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपाने ऐतिहासिक विजय मिळविला. आजवरच्या इतिहासात प्रथमच सर्व १७ महापालिकांमध्ये भाजपाचे महापौर निवडून आले आहेत. १४२० पैकी ८१३ नगरसेवक भाजपाचे विजयी झालेत. या प्रचंड विजयासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जनतेचे आभार मानताना राज्याला विकासाचे तिहेरी इंजिन दिल्याबद्दल धन्यवादही दिले आहेत.
भाजपाचा हा आजवरचा सर्वांत मोठा विजय आहे. सरकार आणि पक्षाचे संघटन यांच्यातील योग्य समन्वयामुळेच हा विजय साध्य झाला आहे. हा विजय जनतेचा आहे; कारण त्यांचा सुशासनावर विश्वास आहे, हा विजय कार्यकर्त्यांनी घेतलेल्या परिश्रमाचा आहे, असे योगी आदित्यनाथ यांनी पत्रपरिषदेत सांगितले. यावेळी उपमु‘यमंत्रिद्वय केशव प्रसाद मौर्य आणि ब्रजेश पाठकही उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मार्गदर्शनही या विजयासाठी कारणीभूत आहे. मोदी यांचे सर्वसमावेशक राजकारण, विकासभिमुख कामे आणि समाजातील सर्व घटकांची काळजी घेणारे धोरण जनतेच्या पसंतीला उतरले आणि म्हणूनच इतका मोठा विजय साध्य करता आला, असे आदित्यनाथ यांनी सांगितले.
अशी आहे भाजपाची कामगिरी
महापालिका
महापौर १७
भाजपा १७
सपा ००
बसपा ००
काँग्रेस ००
नगर पालिका १९९
भाजपा ९४
सपा ३९
बसपा १६
काँग्रेस ०४
अन्य ४६
नगर पंचायत ५४४
भाजपा १९६
सपा ९१
काँग्रेस १४
बसपा ३८
अन्य २०५