|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 06:00 | सूर्यास्त : 18:46
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 27.86° C

कमाल तापमान : 28.61° C

तापमान विवरण : clear sky

आद्रता : 74 %

वायू वेग : 2.53 Mps

स्थळ : Mumbai, IN

28.61° C

Weather Forecast for
Saturday, 04 May

27.51°C - 30.55°C

sky is clear
Weather Forecast for
Sunday, 05 May

28.01°C - 30.97°C

sky is clear
Weather Forecast for
Monday, 06 May

28.26°C - 30.45°C

scattered clouds
Weather Forecast for
Tuesday, 07 May

27.82°C - 30.02°C

sky is clear
Weather Forecast for
Wednesday, 08 May

27.66°C - 29.83°C

sky is clear
Weather Forecast for
Thursday, 09 May

27.67°C - 29.81°C

light rain
Home » आसाम-ईशान्य भारत, राज्य » दोनपेक्षा जास्त मुले मिळणार पगार वाढ!

दोनपेक्षा जास्त मुले मिळणार पगार वाढ!

गंगटोक, (१२ मे) – ज्या सरकारी कर्मचार्‍यांना दोन-तीन मुले आहेत त्यांना आता आगाऊ पगार मिळणार सोबतच या कर्मचार्‍यांच्या पगारातही वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सिक्कीम सरकारने हा निर्णय राज्याची स्थानिक लोकसंख्या वाढवण्यासाठी घेतला आहे. यावर्षी १ जानेवारीपासून पगार वाढवून अ‍ॅडव्हान्स देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. १० मे रोजी जारी केलेल्या अधिसूचनेत कार्मिक विभागाचे सचिव रिंजिंग चेवांग भुतिया यांनी सांगितले की, सिक्कीम प्रमाणपत्र किंवा ओळख प्रमाणपत्र धारण करणार्या सरकारी कर्मचार्यांना दोन मुले असल्यास त्यांच्या पगारात वाढ केली जाईल. यासोबतच ज्या कर्मचार्‍यांना तीन अपत्ये आहेत त्यांच्या पगारात वाढीव वाढ दिली जाणार आहे.
भुतिया यांनी सांगितले की, ही योजना १ जानेवारी २०२३ पासून लागू होईल आणि ज्या कर्मचार्‍यांचे दुसरे आणि तिसरे अपत्य या वर्षी १ जानेवारीला किंवा त्यानंतर जन्मले आहे तेच या योजनेसाठी पात्र असतील. दत्तक घेतल्यास या योजनेचा लाभ लागू होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेमसिंग तमांग यांनी राज्यातील स्थानिक लोकांमधील कमी प्रजनन दराकडे लक्ष वेधण्यासाठी सवलतीचे आश्वासन दिले होते. आता आश्वासनानंतर तब्बल ४ महिन्यांनी ही योजना समोर आली आहे. तमांग यांनी या वर्षी जानेवारीमध्ये गंगटोक येथे एका कार्यक्रमात सांगितले होते की, सिक्कीममधील स्थानिक लोकांमध्ये कमी प्रजनन दर हा गंभीर चिंतेचा विषय आहे. लोकसंख्या वाढवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले पाहिजेत. सुमारे सात लाख लोकसंख्या असलेले सिक्कीम हे भारतातील सर्वात कमी लोकसंख्या असलेले राज्य आहे. राज्याचा एकूण प्रजनन दर १.१ आहे, जो देशातील सर्वात कमी आहे.

Posted by : | on : 12 May 2023
Filed under : आसाम-ईशान्य भारत, राज्य
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g