|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 05:54 | सूर्यास्त : 18:51
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 28.85° C

कमाल तापमान : 29.99° C

तापमान विवरण : few clouds

आद्रता : 84 %

वायू वेग : 1.68 Mps

स्थळ : Mumbai, IN

29.99° C

Weather Forecast for
Sunday, 19 May

29.21°C - 32.15°C

sky is clear
Weather Forecast for
Monday, 20 May

28.65°C - 31.48°C

sky is clear
Weather Forecast for
Tuesday, 21 May

28.57°C - 30.39°C

sky is clear
Weather Forecast for
Wednesday, 22 May

28.58°C - 30.33°C

broken clouds
Weather Forecast for
Thursday, 23 May

28.41°C - 30.14°C

broken clouds
Weather Forecast for
Friday, 24 May

28.64°C - 30.26°C

light rain
Home » दिल्ली, राज्य » प्राणवायू रोखाल तर लटकवूच

प्राणवायू रोखाल तर लटकवूच

रुग्णालयांना संरक्षण द्या, दिल्ली उच्च न्यायालयाने दिली तंबी,
नवी दिल्ली, २४ एप्रिल – मे महिन्याच्या मध्यात कोरोना सर्वोच्च शिखर गाठणार असून, ही स्थिती हाताळण्यासाठी आतापासूनच सज्ज राहा. सध्या जे आकडे समोर येत आहेत, ते त्सुनामीसारखेच असून, प्राणवायूअभावी दिल्लीत हाहाकार माजला आहे, असे निरीक्षण दिल्ली उच्च न्यायालयाने आज शनिवारी नोंदविले. रुग्णालयांना होणार्‍या प्राणवायूच्या पुरवठ्यात जो कुणी अडथळा आणेल, त्याला लटकविल्याशिवाय राहणार नाही, असा गंभीर इशाराही न्यायालयाने दिला.
देशातील अनेक भागात अपुर्‍या प्राणवायूमुळे लोकांना जीव गमवावा लागत असल्याच्या घटना मन खिन्न करणार्‍या आहेत. प्राणवायूचा पुरवठा पुरेसा नसल्यामुळे रुग्ण दगावत आहेत. ही बाब चिंता वाढविणारी आहे, असे न्या. विपीन सांघी आणि न्या. रेखा पल्ली यांच्या खंडपीठाने महाराजा अग्रसेन रुग्णालयातर्फे दाखल याचिकेवर सुनावणी करताना सांगितले.
रुग्णालयाने गंभीर आजारी बाधितांना प्राणवायूच्या होत असलेल्या कमतरतेमुळे न्यायालयाचे दार ठोठावले होते. प्राणवायूचा पुरवठा रोखण्याचा प्रयत्न कोण करीत आहे, याची माहिती दिल्ली सरकारने आम्हाला द्यावी. यात जो कुणी दोषी आढळेल, त्याला लटकविण्यात येईल, असे न्यायालयाने स्पष्ट केले. दिल्लीत दररोज ४८० मेट्रिक टन इतका प्राणवायूचा पुरवठा केला जाईल, असे आश्‍वासन केंद्राने आम्हाला तीन दिवसांपूर्वी दिले होते. हा पुरवठा केव्हापर्यंत सुरळीत होणार, असा सवालही न्यायालयाने केला.
दिल्लीच्या जयपूर गोल्डन रुग्णालयात २० जणांचा मृत्यू
दिल्लीतील जयपूर गोल्डन रुग्णालयात प्राणवायूच्या कमतरतेमुळे २० जणांना आपला जीव गमवावा लागला. यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांमध्ये असंतोष निर्माण झाला होता. प्राणवायूच्या कमतरतेमुळे अन्य २०० रुग्णांचा जीवही धोक्यात आला होता. मात्र, ऐनवळी प्राणवायूचा टँकर आल्यामुळे या रुग्णांचे प्राण वाचले.
विशेष म्हणजे, राजधानीतील सर गंगाराम रुग्णालयात याआधी २५ जणांना प्राणवायूच्या कमतरतेमुळे जीव गमवावा लागला होता. त्याच इतिहासाची पुनरावृत्ती जयपूर गोल्डन रुग्णालयात झाली. प्राणवायूचा पुरवठा थांबल्यामुळे अत्यवस्थ अवस्थेतील २० रुग्णांचा जीव गेला.
रुग्णालयात दाखल असलेल्या ३०० पैकी ८० टक्के बाधित प्राणवायूवर होते. ३५ जणांवर अतिदक्षता कक्षात उपचार सुरू होते. प्राणवायूचा साठा कमी झाल्यामुळे त्याचा दाब कमी झाला, परिणामी २० जणांचा मृत्यू झाला, असे वैद्यकीय अधीक्षक डॉ. डी. के. बलुजा यांनी सांगितले. प्राणवायूचा साठा कमी होत असल्याची माहिती आम्ही सरकारला दिली होती. प्राणवायूच्या पुरवठ्‌‌‌यासाठी प्रयत्न करीत असल्याचे आम्हाला सांगण्यात आले. त्यानुसार प्राणवायूचा एक टँकर रात्री तर दुसरा आज दुपारी आम्हाला मिळाला. यामुळे उर्वरित २०० रुग्णांचा जीव वाचवता आले, असे ते म्हणाले.
दिल्लीच्या अनेक खाजगी रुग्णालयांना प्राणवायूच्या टंचाईच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. प्राणवायूच्या टंचाईमुळे दिल्लीतील अनेक खाजगी रुग्णालयांनी नवे रुग्ण दाखल करुन घेण्याचे थांबवले आहे.

Posted by : | on : 24 Apr 2021
Filed under : दिल्ली, राज्य
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g