किमान तापमान : 30.18° C
कमाल तापमान : 30.18° C
तापमान विवरण : clear sky
आद्रता : 65 %
वायू वेग : 5.54 Mps
स्थळ : Mumbai, IN
30.18° C
27.32°C - 30.24°C
sky is clear27.98°C - 31.12°C
sky is clear28.13°C - 30.39°C
few clouds27.9°C - 30.05°C
sky is clear27.63°C - 29.93°C
sky is clear27.75°C - 29.94°C
few cloudsबंगळुरू, (१२ सप्टेंबर) – भाजपा आणि जनता दल सेक्युलर (जदएस) यांच्यातील युतीबाबत गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेली चर्चा आता संपुष्टात आली आहे. जदएसचे सुप्रिमो आणि माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांनी सांगितले की, भाजपा आणि जदएस एकत्र लोकसभा निवडणूक लढतील.
बंगळुरूमध्ये एका कार्यक्रमात ते म्हणाले की, दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी एकत्र निवडणुका लढवण्याचे मान्य केले आहे. जदएस किती जागा लढवणार, हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बोलून ठरवले जाईल. पक्षाचे अस्तित्व टिकवण्यासाठी निर्णय घेतला आहे. विरोधी पक्षांच्या आघाडीबाबत ते म्हणाले की, मी एवढा मोठा धर्मनिरपेक्ष नेता आहे, तरीही काँग्रेसने या आघाडीत सहभागी होण्यासाठी माझ्याशी संपर्कही केलेला नाही.
८ सप्टेंबर रोजी कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपा नेते बी. एस. येदीयुरप्पा म्हणाले होते की, जदएस लोकसभा निवडणूक भाजपासोबत लढेल. अमित शाह यांनी त्यांना लोकसभेच्या चार जागा देण्याचे मान्य केले आहे. मात्र, याआधी जदएसने कर्नाटकात २८ पैकी पाच जागांची मागणी केली होती. दुसर्याच दिवशी म्हणजे ९ सप्टेंबर रोजी माजी मुख्यमंत्री आणि जदएसचे नेते एच. डी. कुमारस्वामी यांनी भाजपा नेते येदीयुरप्पा यांचे विधान फेटाळले होते. ते म्हणाले होते की, ही येदीयुरप्पा यांची वैयक्तिकप्रतिकि‘या आहे. आतापर्यंत दोन्ही पक्षांमध्ये जागावाटपावर कोणतीही चर्चा झालेली नाही. आम्ही दोन-तीन वेळा भेटलो, पण अजून निर्णय झालेला नाही.
कुमारस्वामी यांनीही युतीबाबत भूमिका स्पष्ट केली. आम्ही एकत्र येतो की नाही, हे नंतर बघू, पण काँग्रेस राज्याची लूट करीत असल्याने राज्यातील जनतेने आम्ही (दोन्ही पक्षांनी) सोबत येण्याचे आवाहन केले आहे, असेही ते म्हणाले.