|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 06:00 | सूर्यास्त : 18:46
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 30.08° C

कमाल तापमान : 31.99° C

तापमान विवरण : clear sky

आद्रता : 48 %

वायू वेग : 5.46 Mps

स्थळ : Mumbai, IN

31.99° C

Weather Forecast for
Friday, 03 May

27.24°C - 31.99°C

sky is clear
Weather Forecast for
Saturday, 04 May

27.63°C - 30.65°C

sky is clear
Weather Forecast for
Sunday, 05 May

27.77°C - 31.02°C

sky is clear
Weather Forecast for
Monday, 06 May

28.29°C - 31.38°C

sky is clear
Weather Forecast for
Tuesday, 07 May

28.45°C - 30.48°C

sky is clear
Weather Forecast for
Wednesday, 08 May

27.86°C - 30.01°C

sky is clear
Home » मध्य प्रदेश-छत्तीसगड, राज्य » सुकमातील सात गावे पुन्हा उजळली

सुकमातील सात गावे पुन्हा उजळली

– नक्षलवाद्यांनी तोडला होता वीजपुरवठा,
रायपूर, (२३ सप्टेंबर) – नक्षलवाद्यांनी पायाभूत सुविधांचे नुकसान केल्यानंतर सुकमा जिल्ह्यातील सात दुर्गम गावांतील ३४२ कुटुंबांचा वीजपुरवठा सुमारे २५ वर्षांनंतर पुन्हा सुरू झाला आहे. १९९० च्या दशकाच्या उत्तरार्धात, नक्षलवाद्यांनी सुकमा जिल्ह्यात हैदोस घालून विजेचे खांब आणि इतर पायाभूत सुविधा उद्ध्वस्त केल्या आणि स्थानिकांना मूलभूत सुविधांपासून वंचित ठेवले होते.
डब्बाकोंटा, पिडमेल, एकलगुडा, दुरमांगू, तुंबांगू, सिंगनपॅड आणि डोकपाड या सात गावांना या आठवड्याच्या सुरुवातीला वीजपुरवठा करण्यात आला आणि अंधारात असलेली गावे प्रकाशमान झाली, असे सुकमाचे जिल्हाधिकारी हरीस एस. यांनी सांगितले. सरकार आणि प्रशासन लोकांना धान्य, वीज आणि पाणी यासार‘या मूलभूत सुविधा पुरवण्यासाठी कटिबद्ध आहे, विशेषत: समाजाच्या शेवटच्या माणसाला कल्याणकारी योजनांचा लाभ मिळेल याची खात्री करा, असे जिल्हाधिकार्यांनी वृत्तसंस्थेला सांगितले.
काही घरांमध्ये बल्ब लावण्यासाठी आणि पंखे चालवण्यासाठी सौरऊर्जा उपलब्ध होती, तरीही देखभालीच्या समस्यांमुळे तेही अडचणीत आले होते. या सात गावांतील सुमारे ३४२ कुटुंबांना विजेचा लाभ झाला आहे, असे जिल्हाधिकार्यांनी सांगितले. अतिसंवेदनशील भागात मूलभूत सुविधांचा विकास करणे हे सरकारचे प्राधान्य आहे. परिसरातील इतर गावांनाही लवकरच वीजपुरवठा करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. राजधानी रायपूरपासून ४०० किमी अंतरावर असलेल्या दक्षिण छत्तीसगडमधील मागास बस्तर विभागातील सात जिल्ह्यांपैकी सुकमा आहे.
पोलिस महानिरीक्षक (बस्तर रेंज) सुंदरराज पी. म्हणाले की, या भागात सहा पोलिस छावण्या स्थापन केल्याने अशा दुर्गम भागांचा विकास सुनिश्चित करण्यात आणि कल्याणकारी योजनांचा लाभ लोकांपर्यंत पोहोचवण्यात मदत झाली आहे. १९९० च्या दशकाच्या उत्तरार्धापर्यंत या गावांमध्ये वीज होती. परंतु नक्षलवाद्यांनी विजेचे खांब आणि पायाभूत सुविधांचे नुकसान केले. त्यामुळे गावकरी सुमारे २५ वर्षांपासून वीज पुरवठ्यापासून वंचित होते, असे त्यांनी वृत्तसंस्थेला सांगितले.

Posted by : | on : 23 Sep 2023
Filed under : मध्य प्रदेश-छत्तीसगड, राज्य
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g