किमान तापमान : 30.08° C
कमाल तापमान : 31.99° C
तापमान विवरण : clear sky
आद्रता : 48 %
वायू वेग : 5.46 Mps
स्थळ : Mumbai, IN
31.99° C
27.24°C - 31.99°C
sky is clear27.63°C - 30.65°C
sky is clear27.77°C - 31.02°C
sky is clear28.29°C - 31.38°C
sky is clear28.45°C - 30.48°C
sky is clear27.86°C - 30.01°C
sky is clear-अन्न प्रक्रिया प्रकल्पाबाबत खोटे आरोप,
गुवाहाटी, (२३ सप्टेंबर) – आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा यांच्या पत्नी रिनिकी भुयान यांनी काँग्रेसचे खासदार गौरव गोगोई यांच्याविरोधात १० कोटी रुपयांचा मानहानीचा दावा दाखल केला आहे. रिनिकी यांचे वकील देवजित सैकिया यांनी वृत्तसंस्थेला सांगितले की, शुक्रवारी कामरूप महानगर दिवाणी न्यायालयात खटला दाखल करण्यात आला आहे. सैकिया यांनी सांगितले की, माझ्या अशिलाने गौरव गोगोई यांच्याविरोधात १० कोटी रुपयांचा मानहानीचा दावा दाखल केला. अनुदान मिळण्यासाठी आम्ही कधीही अर्ज केला नाही. खरं तर, गौरव गोगोई यांनी रिनिकी यांच्यावर अन्न प्रक्रिया प्रकल्पाबाबत खोटे आरोप केले आहेत.
गुवाहाटीस्थित डिजिटल मीडिया ‘द क्रॉसकरंट’ने एक वृत्त प्रकाशित केल्यावर या वादाने जोर धरला. नागाव जिल्ह्यातील कालियाबोर येथील दरिगाजी गावातील १७ एकरपेक्षा जास्त शेतजमीन प्राईड इस्ट एंटरटेन्मेंट्सने खरेदी केल्याच्या महिनाभरात औद्योगिक जमीन म्हणून पुनर्वर्गीकृत करण्यात आल्याचा आरोप या अहवालात करण्यात आला आहे, ज्यात मुख्यमंत्र्यांच्या पत्नीचा समावेश आहे. गोगोई यांनी या प्रकल्पासाठी केंद्र सरकारकडून अनुदान मिळवण्यात सरमा आणि त्यांच्या पत्नीवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. यासंदर्भातील वस्तुस्थिती समोर आणण्यासाठी काँग्रेसने केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्तक्षेपाची मागणी केली आहे.