किमान तापमान : 29.12° C
कमाल तापमान : 29.37° C
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 79 %
वायू वेग : 3.59 Mps
स्थळ : Mumbai, IN
29.12° C
28.79°C - 30.56°C
sky is clear28.15°C - 30.49°C
sky is clear28°C - 30.33°C
sky is clear27.64°C - 29.82°C
sky is clear27.9°C - 30.46°C
sky is clear28.28°C - 30.44°C
broken cloudsनुंह, (१८ नोव्हेंबर) – हरयाणाच्या नुंहमध्ये पुन्हा एकदा जातीय तणाव निर्माण झाला आहे. गुरुवारी रात्री मुलगा झाल्याच्या आनंदात विहीर पूजनासाठी गेलेल्या महिला परतत असताना त्यांच्यावर मशिदीतून दगडफेक करण्यात आली आणि त्यामुळे हा जातीय तणाव निर्माण झाला. या दगडफेकीत नऊ महिला जखमी झाल्या आहेत.
घटनेची माहिती प्राप्त होताच पोलिस अधीक्षक नरेंद्रसिंह यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली आणि परिस्थितीचे गांभीर्य पाहून तेथे मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला. शहरातील कबीर मोहल्ला येथील काही महिला विहीर पूजन करण्यासाठी कैलास मंदिराकडे मोठ्या मशिदीच्या मागच्या गल्लीतून जात असताना त्यांच्यावर दगडफेक करण्यात आली, तेव्हा त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. पूजन करून त्या परतत असताना त्यांच्यावर काही असामाजिक तत्त्वांनी मशिदीच्या गच्चीवरून पुन्हा दगडफेक केली. महिलांनी आपल्या कुटुंबातील सदस्यांना फोन करून घटनेची माहिती दिली. त्यानंतर कबीर मोहल्ल्यातील लोकं मोठ्या संख्येने मोठ्या मशिदीजवळ गोळा झाले आणि त्यांनी दगडफेक करणार्यांची छायाचित्र काढणे सुरू केले. त्यामुळे त्यांच्यावरही दगडफेक करण्यात आली. घटनेबाबत पोलिसांना कळविण्यात आले. माहिती कळताच पोलिस अधिकार्यांसह मोठ्या प्रमाणावर पोलिसांनी घटनास्थळाकडे धाव घेतली.
याआधीही नुंहमध्ये शोभायात्रेवर दगडफेक करण्यात आल्यानंतर मोठ्याप्रमाणावर हिंसाचार झाला होता. शोभायात्रा मधातच थांबवावी लागली होती. नंतर विहिंप बजरंग दल यांच्या पुढाकारातून ती काही दिवसांनी पूर्ण करण्यात आली होती.