किमान तापमान : 29.72° C
कमाल तापमान : 30.99° C
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 84 %
वायू वेग : 5.21 Mps
स्थळ : Mumbai, IN
30.99° C
28.72°C - 31.5°C
overcast clouds28.24°C - 30.77°C
overcast clouds28.45°C - 30.45°C
scattered clouds28.46°C - 30.08°C
broken clouds28.57°C - 30.43°C
light rain28.51°C - 30.58°C
light rain– आसाम सरकारने काढले परिपत्रक,
गुवाहाटी, (२८ ऑक्टोबर) – आसाममध्ये आता सरकारी कर्मचार्यांना दुसर्या लग्नासाठी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागणार आहे. हिमंता बिस्व सरमा सरकारने एक परिपत्रक जारी करून ही माहिती दिली. त्याची तातडीने अंमलबजावणी करण्याचा आदेशही सरकारने दिला. परिपत्रकानुसार, ज्या सरकारी कर्मचार्याची पत्नी किंवा पती जिवंत आहे, तो सरकारच्या परवानगीशिवाय दुसरे लग्न करू शकणार नाही. तसे न केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल.
कोणी या नियमांकडे दुर्लक्ष करून दुसरे लग्न केले तर, त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. विशेष परिस्थितीत सरकारच्या परवानगीने दुसरा विवाह करता येतो. राज्य कार्मिक विभागाचे अतिरिक्त मु‘य सचिव नीरज वर्मा यांनी जारी केलेल्या परिपत्रकात आदेशाच्या विरोधात एखाद्या कर्मचार्याने दुसरे लग्न केल्यास त्याला सक्तीच्या निवृत्तीसह इतर दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागू शकते. कोणत्याही सरकारी कर्मचार्याने दुसर्यांदा लग्न करणे चांगले आचरण मानले जात नाही. याचा समाजावर मोठा परिणाम होतो.
बालविवाह आणि दुसर्या विवाहावर शासन कठोर
प्राप्त वृत्तानुसार, राज्य सरकारने बालविवाहावर बंदी घातली आहे. त्यामुळे फेब्रुवारीपासून राज्यभरात हजारो जणांना अटक करण्यात आली आहे. ऑक्टोबरच्या सुरुवातीला पोलिसांनी अल्पवयीन मुलींचे लग्न रोखण्यासाठी मोहीम सुरू केली आणि १,०३९ लोकांना अटक केली. यातील बहुतांश घटनांमध्ये मुलींचे त्यांच्या इच्छेविरुद्ध लग्न होत होते.