किमान तापमान : 28.56° C
कमाल तापमान : 28.99° C
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 84 %
वायू वेग : 5.35 Mps
स्थळ : Mumbai, IN
28.99° C
28.81°C - 30.59°C
sky is clear28.09°C - 30.43°C
sky is clear27.96°C - 30.27°C
sky is clear27.6°C - 29.85°C
sky is clear27.94°C - 30.15°C
few clouds27.93°C - 29.93°C
few clouds– कर्नाटक उच्च न्यायालयाचे ताशेरे,
बंगळुरू, (१५ डिसेंबर) – द्रौपदीसाठी भगवान कृष्ण धावून आले होते. सध्याच्या आधुनिक युगात तिच्या मदतीसाठी कुणीही धावून आले नाही. दुर्दैवाने हे जग दुर्योधन व दु:शासनांचे आहे, अशा शब्दांत न्यायमूर्तींनी आपली तीव्र नाराजी व्यक्त केली. देशात एकीकडे महिला सशक्तीकरणासाठी मोहीत हाती घेतली जात आहे. दुसरीकडे, याच महिलांवर मोठ्या प्रमाणात छळ झाल्याचे धक्कादायक प्रकार समोर येत आहेत. बेळगावमधील अशाच एका घटनेमुळे देशाला हादरून सोडले आहे. बेळगावमध्ये घडलेल्या या प्रकरणाची खुद्द कर्नाटक उच्च न्यायालयाने दखल घेत, कर्नाटक सरकार व पोलिसांची कानउघाडणी केली.
बेळगावमध्ये ११ डिसेंबर रोजी एक तरुणी आपल्या साखरपुड्याच्या दिवशी त्याच गावात राहणार्या तिच्या प्रियकरासमवेत फिरायला गेली. याचा राग तरुणीच्या कुटुंबीयांना आल्यानंतर त्यांनी थेट त्या तरुणाच्या घरी धाव घेतली. त्याच्या आईला बेदम मारहाण केली तसेच या महिलेची नग्न धिंड काढून तिला एका विजेच्या खांबाला दोन तास बांधून ठेवले. या प्रकरणामुळे बेळगावसह देशभरात खळबळ उडाली होती. मुख्य न्यायमूर्ती प्रसन्ना वराले आणि न्यायमूर्ती कृष्णा दीक्षित यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणी सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने संतप्त टिप्पणी करीत, पोलिस यंत्रणेवर ताशेरे ओढले. अशा घटनांनंतर देशातील इतर महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असेल. असा प्रकार महाभारतातही घडला नव्हता. द्रौपदीसाठी भगवान कृष्ण धावून आले होते. सध्याच्या आधुनिक युगात तिच्या मदतीसाठी कुणीही धावून आले नाही. दुर्दैवाने हे जग दुर्योधन व दु:शासनांचे आहे, अशा शब्दांत न्यायमूर्तींनी आपली तीव्र नाराजी बोलून दाखवली.
आधी मारहाण आणि नंतर नग्न धिंड काढल्यानंतर या महिलेला दोन तास विजेच्या खांबाला बांधून ठेवण्यात आले. यावरून न्यायालयाने संताप व्यक्त केला. त्या महिलेला दानवांच्या दयेवर सोडून देण्यात आले होते. कल्पना करा, त्या महिलेला याचा किती मोठा धक्का बसला असेल. आपण जोपर्यंत त्या महिलेच्या जागी स्वत:ला ठेवत नाही, तोपर्यंत आपल्याला हे जाणवणार नाही. आरोपींना माणूस म्हणायची मला लाज वाटते. कुणी इतके क्रूर कसे होऊ शकते, असा उद्विग्न सवाल न्यायालयाने केला. पोलिसांना घटनास्थळी पोहोचण्यासाठी दोन तास का लागले, असा सवालही न्यायालयाने केला. यासंदर्भात थेट पोलिस आयुक्तांना न्यायालयासमोर घटनेचा सविस्तर अहवाल सादर करण्याचा आदेश न्यायालयाने दिले आहेत तसेच हे प्रकरण अत्यंत कठोरपणे हाताळले जाईल, असा दम न्यायालयाने प्रशासन व आरोपींना दिला.