किमान तापमान : 27.34° C
कमाल तापमान : 28.03° C
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 69 %
वायू वेग : 1.06 Mps
स्थळ : Mumbai, IN
27.34° C
26.99°C - 30.64°C
sky is clear27.62°C - 30.93°C
sky is clear27.82°C - 31.09°C
sky is clear28.3°C - 31.08°C
sky is clear28.42°C - 30.7°C
sky is clear27.95°C - 30.1°C
sky is clear-पंतप्रधान मोदींवर केली टीका,
कोलार, (१६ एप्रिल) – पुढील महिन्यात कर्नाटकात होणार्या विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेस पक्ष सत्तेवर येईल, असा दावा करीत, उद्योगपती गौतम अदानी हे भ्रष्टाचाराचे प्रतीक असल्याचे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटले आहे. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. राहुल गांधी यांनी रविवारी कर्नाटक जिल्हा मु‘यालयात अदानी भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित करून पंतप्रधान मोदी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. ते येथे ‘जय भारत’ रॅलीला संबोधित करीत होते.
१० मे रोजी विधानसभा निवडणुका होणार असलेल्या कर्नाटकमध्ये काँग्रेस सत्तेवर येईल, असा विश्वास व्यक्त करून राहुल गांधी म्हणाले की, पक्षाने सरकार स्थापन केल्यानंतर पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत प्रमुख निवडणूक आश्वासनांना मान्यता देईल आणि त्यांच्या अंमलबजावणीचा मार्ग मोकळा होईल. कर्नाटक विधानसभा निवडणुका काँग्रेस पक्ष एकजुटीने लढत आहे, याचा मला खूप आनंद आहे.
सभेला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खडगे, कर्नाटकचे प्रभारी सरचिटणीस रणदीप सुरजेवाला, प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार, विधिमंडळ पक्षाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यासह वरिष्ठ काँग्रेस नेत्यांनी जाहीर सभेला संबोधित केले. राहुल गांधी यांनी २०१९ मध्ये कोलार येथेच मोदी आडनावावर टिप्पणी केली होती. त्यावरून त्यांना मानहानी प्रकरणी दोषी ठरवण्यात आले आणि त्यांचे संसद सदस्यत्व काढून घेण्यात आले.