किमान तापमान : 28.83° C
कमाल तापमान : 29.99° C
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 84 %
वायू वेग : 3.48 Mps
स्थळ : Mumbai, IN
29.99° C
27.7°C - 29.99°C
sky is clear28.13°C - 30.93°C
sky is clear28.35°C - 29.77°C
sky is clear28.06°C - 29.68°C
sky is clear27.83°C - 29.23°C
sky is clear27.7°C - 29.15°C
sky is clear-लोकार्पण सोहळ्यात दीदींनी रेकॉर्ड केलेले खास भजन व श्लोक,
अयोध्या, (०९ ऑक्टोबर) – लतादीदींच्या आवाजातील भजन ही भाविकांसाठी पर्वणीच असते. आजही देशातील प्रत्येक सणाच्या वेळी दीदींच्या भजनाचे सूर घुमल्याशिवाय राहत नाहीत. भक्तीगीतांकडे तसाही दीदींचा ओढा जास्तच होता. श्रीराम, श्रीकृष्ण, गणपती, विठ्ठल अशा सर्व देवतांच्या आणि दैवतांच्या भजनांमध्ये त्या रमायच्या. अयोध्येत श्रीरामाचे मंदिर साकारणार म्हणून त्या उत्सूक होत्या. त्यासाठी त्यांनी काही भजने तयार करून ठेवली होती आणि आपल्या आवाजात ती रेकॉर्ड केली होती. त्या भजनांचे सूर त्यांच्या अनुपस्थितीतही अयोध्येत दुमदुमणार आहेत.
गानकोकिळा म्हणून सार्या जगात ओळखल्या जाणार्या ज्येष्ठ गायिका भारतरत्न लता मंगेशकर या आज आपल्यात नाहीत. परंतु, त्यांची गाणी आजही आपल्या सर्वांच्या ओठांवर असतात. हिंदीसह इतरही बर्याच भाषांमध्ये गाणी लतादीदी यांनी म्हटली आहेत. चित्रपटांसाठीही त्यांनी गाणी गायलीच पण याबरोबरीनेच त्यांनी भक्ती संगीतालाही तितकेच महत्त्व दिले. अगदी शेवटच्या दिवसांतही लतादीदी यांची भक्तीगीतांसाठी ओढ कायम होती.
अयोध्या येथील राम मंदिराच्या लोकार्पणासाठी लतादीदी यांनी काही भजन आणि श्लोक रेकॉर्ड केल्याचेही नुकतेच समोर आले आहे. लतादीदींनी त्यांच्या शेवटच्या दिवसांत उभे राहायला त्रास होत असूनसुद्धा ही भजने रेकॉर्ड केली. लतादीदी यांनी संगीतकार मयूरेश पै यांना बोलावून राम मंदिरासाठी काही निवडक भजनं आणि श्लोक यांच्या रेकॉर्डिंगची कल्पना दिली. जानेवारी २०२४ मध्ये जेव्हा या मंदिराचे लोकार्पण होईल, तेव्हा ही भजनं तिथे उपस्थित असलेल्या श्रोत्यांना ऐकायला मिळावीत, अशी लतादीदी यांची इच्छा होती.
६ फेब्रुवारी २०२२ रोजी ९२ व्या वर्षी लता मंगेशकर नावाचे संगीतक्षेत्रातील एक पर्व संपले, पण आजही लतादीदी त्यांच्या गाण्यांच्या माध्यमातून आपल्यातच आहेत व कायम असतील. जानेवारीमधील राम मंदिर लोकार्पण सोहळ्याला काहीच महिने शिल्लक आहेत. अद्याप मंदिर समितीने दीदींच्या भजनांविषयीची अधिकृत घोषणा केली नसली तरी, तो निर्णय होण्यात कोणतीही अडचण नाही, अशी सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याला दीदींच्या आर्त आणि भावपूर्ण स्वरांनी श्रीरामांचा स्वराभिषेक होणार, हे जवळपास निश्चितच मानले जात आहे.