किमान तापमान : 27.51° C
कमाल तापमान : 27.51° C
तापमान विवरण : clear sky
आद्रता : 67 %
वायू वेग : 2.77 Mps
स्थळ : Mumbai, IN
27.51° C
27.52°C - 30.55°C
sky is clear28.01°C - 30.97°C
sky is clear28.26°C - 30.45°C
scattered clouds27.82°C - 30.02°C
sky is clear27.66°C - 29.83°C
sky is clear27.67°C - 29.81°C
light rain-पंतप्रधान मोदी यांचा हल्ला,
कोलाघाट, (१२ ऑगस्ट) – मणिपूरच्या मुद्यावरून माझ्या सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणणार्या विरोधकांनी प्रस्तावावर मतदान सुरू होण्याआधीच पळ काढला. चर्चा पूर्ण होऊन मतदान झाले असते, तर विरोधकांचा खरा चेहरा समोर आला असता. आपल्या नव्या ‘इंडिया’ आघाडीत किती मतभेद आहेत, हे जनतेसमोर येईल आणि हेच नको असल्याने विरोधकांनी पळवाट शोधली, असा हल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी केला.
विरोधकांनी मणिपूरबाबत माझ्या सरकारविरोधात देशभरात नकारात्मक प्रचार केला. त्याला आम्ही मात दिली. मणिपूरवर चर्चेची सातत्याने मागणी करणारे विरोधक प्रत्यक्ष चर्चेत गंभीर दिसले नाहीत. त्यांना फक्त खोटे आरोप करून सरकारला बदनाम करायचे होते. मात्र, आम्ही त्यांचा हा प्रयत्न हाणून पाडला, असे मोदी यांनी येथे सांगितले. पश्चिम बंगालमधील पंचायत राज परिषदेला आभासी संबोधित करताना मोदी बोलत होते.
संसदेत चर्चेच्या माध्यमातून मणिपूर समस्येवर तोडगा काढण्याची चांगली संधी चालून आली होती. मात्र, विरोधकांना फक्त यावर राजकारण करायचे होते. त्यामुळे या संधीचा पाहिजे तसा वापर करता आला नाही, असे पंतप्रधान म्हणाले. यावेळी त्यांनी ममता बॅनर्जी सरकारवरही सडकून टीका केली. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक काळात ममता सरकारने प्रचंड दहशत निर्माण केली होती. उमेदवारांना आपले अर्जही भरता आले नव्हते. सर्वत्र भीतीचे वातावरण होते. असे असतानाही ममता बॅनर्जी स्वत:ला लोकशाहीच्या रक्षक म्हणवून घेत असतात, अशी टीका मोदी यांनी केली.