|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 06:03 | सूर्यास्त : 18:44
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 29.14° C

कमाल तापमान : 30.99° C

तापमान विवरण : clear sky

आद्रता : 62 %

वायू वेग : 4.66 Mps

स्थळ : Mumbai, IN

30.99° C

Weather Forecast for
Sunday, 28 Apr

30.1°C - 32.95°C

sky is clear
Weather Forecast for
Monday, 29 Apr

29.22°C - 32.92°C

few clouds
Weather Forecast for
Tuesday, 30 Apr

28.74°C - 32.24°C

sky is clear
Weather Forecast for
Wednesday, 01 May

28°C - 30.52°C

sky is clear
Weather Forecast for
Thursday, 02 May

27.57°C - 30.43°C

sky is clear
Weather Forecast for
Friday, 03 May

27.44°C - 30.2°C

sky is clear
Home » नागरी, राष्ट्रीय » ‘आकांक्षी’मुळे २५ कोटी लोकांचे जीवन बदलले

‘आकांक्षी’मुळे २५ कोटी लोकांचे जीवन बदलले

– पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन,
नवी दिल्ली, (३० सप्टेंबर) – आकांक्षी ब्लॉक कार्यक्रमात ब्लॉक पंचायतींची मोठी भूमिका आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीने वेगाने काम केले, तरच प्रत्येक गटाचा विकास वेगाने होईल. या कार्यक्रमाने ११२ जिल्ह्यांतील २५ कोटींहून अधिक लोकांचे जीवन बदलले आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान मोदी यांनी शनिवारी केले. मोदी यांच्या हस्ते येथील भारत मंडपम् येथे देशातील महत्त्वाकांक्षी गटांसाठी संकल्प सप्ताह या विशेष कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
हा कार्यक्रम ३ ते ९ ऑक्टोबर दरम्यान सुरू होईल. हा देशव्यापी कार्यक्रम ७ जानेवारी रोजी पंतप्रधान मोदी यांनी सुरू केला होता. नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी ब्लॉक स्तरावर प्रशासन सुधारणे हा त्याचा उद्देश आहे. देशातील ३२९ जिल्ह्यांतील ५०० आकांक्षी ब्लॉकमध्ये याची अंमलबजावणी केली जात आहे. संकल्प सप्ताहाचा प्रत्येक दिवस एका विशिष्ट विकास संकल्पनेला समर्पित असेल. ज्यावर सर्व ५०० आकांक्षी ब्लॉक काम करतील. प्रगती मैदान येथील इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटरमध्ये विविध राज्यांतील हस्तकला आणि कारागिरांनी त्यांच्या उत्पादनांचे प्रदर्शन भरवले होते. पंतप्रधानांनी एकामागून एक सर्व स्टॉलला भेट दिली, तिथे ठेवलेल्या कलाकृती आणि उत्पादने पाहिली आणि ज्यांनी त्या बनवल्या त्यांच्याशी चर्चा केली. संकल्प सप्ताहाच्या उद्घाटन कार्यक‘मात केंद्रीय ग्रामीण विकास आणि पंचायती राज मंत्री गिरिराजसिंह आणि शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान उपस्थित होते.
विकसित भारतासाठी उत्कृष्ट शिक्षण आवश्यक
संकल्प सप्ताह कार्यक्रमात नरेंद्र मोदी म्हणाले की, विकसित भारताची प्रमुख अट ही आहे की, आपल्या देशातील मुलांना उत्कृष्ट शिक्षण मिळाले पाहिजे. मी त्या सर्व शिक्षक सहकार्यांचे अभिनंदन करतो आणि त्यांचे आभार मानतो, जे कठोर परिश्रम करतात आणि शिक्षणासाठी आपले जीवन समर्पित भावनेने जगतात.

Posted by : | on : 30 Sep 2023
Filed under : नागरी, राष्ट्रीय
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g