किमान तापमान : 28.45° C
कमाल तापमान : 28.45° C
तापमान विवरण : clear sky
आद्रता : 65 %
वायू वेग : 3.65 Mps
स्थळ : Mumbai, IN
28.45° C
27.92°C - 30.07°C
sky is clear28.35°C - 30.5°C
sky is clear28.59°C - 29.99°C
scattered clouds28.22°C - 29.48°C
sky is clear28°C - 29.49°C
sky is clear28.2°C - 29.57°C
sky is clearनवी दिल्ली, (१२ ऑगस्ट) – कांद्याचे वाढते भाव सर्वसामान्यांना रडवायला लागले आहेत. मात्र सरकार कांद्याची भाववाढ रोखण्यासाठी प्रयत्न करत आहे. नुकतेच सरकारने जाहीर केले आहे की, महागाई रोखण्यासाठी ते ऑनलाइन ई-कॉमर्सद्वारे वाजवी दरात कांद्याची विक्री करणार आहेत. सरकारच्या या निर्णयामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. याशिवाय केंद्र सरकारने बफर स्टॉकमधून कांद्याची विक्री सुरू केली आहे.
वास्तविक, सरकारकडे ३ लाख टन कांद्याचा साठा आहे, तो बाजारात आल्यावर कांद्याचे भाव खाली येऊ शकतात. सध्या बाजारात कांद्याचे दर ५० ते ६० रुपये किलोवर पोहोचले आहेत. दुसरीकडे, ज्या राज्यांमध्ये कांद्याचे भाव वाढले आहेत, तेथे सरकार ई-कॉमर्सद्वारे स्वस्त दरात विकणार आहे. सरकार ओएनडीसी सारख्या ऑनलाइन ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर स्वस्त दरात कांदा विकू शकते. महागाई रोखण्यासाठी सरकारने अलीकडेच ओएनडीसीवर टोमॅटोची विक्री सुरू केली होती. राज्य सहकारी संस्था आणि सरकारी महामंडळांच्या घाऊक दुकानांतून लोकांना परवडणार्या दरात कांदा विकण्याची व्यवस्थाही केली जात आहे.