किमान तापमान : 32.76° C
कमाल तापमान : 36.99° C
तापमान विवरण : clear sky
आद्रता : 36 %
वायू वेग : 10.09 Mps
स्थळ : Mumbai, IN
36.99° C
29.18°C - 36.99°C
sky is clear28.97°C - 32.73°C
few clouds28.47°C - 32.01°C
sky is clear27.81°C - 30.92°C
sky is clear27.36°C - 30.03°C
sky is clear27.12°C - 30.03°C
sky is clear– ममतांसोबत हातमिळवणी नाही : येचुरी,
दिल्ली, पंजाबमध्ये काँग्रेसला नको आप,
नवी दिल्ली, (२० जुलै) – पुढील वर्षी होणार्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला सत्तेतून बाहेर करण्यासाठी विरोधकांनी एकत्र येत ‘इंडिया’ असे नाव असलेल्या नव्या आघाडीची स्थापना केली. त्याच्या दुसर्याच दिवशी या आघाडीतील घटक पक्षांमध्ये लाथाळ्या सुरू झाल्या. माकप नेते सीताराम येचुरी यांनी तृणमूलसोबत कोणतीही आघाडी नसल्याचे स्पष्ट केले. आम्ही भाजपा आणि तृणमूल काँग्रेसच्या विरोधात लढू. त्याचवेळी आघाडीत स्पर्धा होणार नाही, याची काळजीही घेऊ. बंगालमध्ये तृणमूल काँग्रेससोबत कोणतीही आघाडी नाही. सध्या इंडियात पंतप्रधानपदाचा कोणताही चेहरा नाही. ही आघाडी राज्यनिहाय असेल, असे येचुरी यांनी सांगितले. तिकडे पंजाब आणि दिल्लीत काँग्रेस आणि आप एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत. या दोन्ही राज्यांमध्ये आपसोबत येण्यास काँग्रेसने विरोध केला आहे.
‘इंडिया’ नाव देण्यावरून श्रेयवाद
‘इंडिया’ (आयएनडीआयए) नावावरून विरोधकांच्या आघाडीत राजकारण सुरू झाले आहे. वेगवेगळे पक्ष हे नाव देण्यावरून श्रेय घेत आहेत. ममता बॅनर्जी यांनी या आघाडीचे नाव सुचवले होते, त्याला राहुल गांधी यांनी अनुमोदन दिले, अशी माहिती सूत्रांनी दिली. ‘इंडिया’ नावावर चर्चा करण्याऐवजी काँग्रेसने बैठकीत थेट प्रस्ताव ठेवला. त्यावर इतर राजकीय पक्षांनी सहमती दर्शवली, अशीही चर्चा आहे. नावावरून श्रेय घेतले जात आहे, असे मला वाटत नसल्याचे काँग‘ेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी सांगितले. या नावाचा विचार राहुल गांधी यांच्याकडून समोर आल्याचा दावा त्यांनी केला.
नितीशकुमारांचा ‘इंडिया’वर आक्षेप
नितीशकुमार यांनी विरोधकांना एकत्र आणले असले तरी, त्यांनी बैठकीत ‘इंडिया’ नावावर आक्षेप घेतला होता, अशी माहिती सूत्रांनी दिली. त्यांचा आक्षेप इंग‘जी नावावर होता. या व्यतिरिक्त पत्रपरिषदेत नितीशकुमार, लालू यादव आणि तेजस्वी यादव उपस्थित नव्हते.
पंतप्रधानपदावर ममतांच्या नावाची दावेदारी
विरोधकांच्या आघाडीत पंतप्रधानपदाचा कोणताही चेहरा नसेल, असे सीताराम येचुरी यांनी म्हटले असले तरी, तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनी या पदासाठी ममता बॅनर्जी यांचे नाव समोर केले आहे. पुढील लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नसेल, तर ममता बॅनर्जी विरोधकांचा चेहरा राहतील, असे तृणमूलचे खासदार शताब्दी राय यांनी सांगितले.
लालू यादवांची अधीररंजन चौधरींवर आगपाखड
बंगळुरू येथे झालेल्या बैठकीत लालू यादव यांनी ममता बॅनर्जी यांचे समर्थन करीत, सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यासमोरच बंगालमधील काँग्रेसचे अध्यक्ष अधीररंजन चौधरी यांच्यावर आगपाखड केली. विरोधकांमध्ये ऐक्य निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असताना ममतांवर का टीका केली जात आहे, असा प्रश्न त्यांनी अधीररंजन यांचे नाव न घेता विचारला.