किमान तापमान : 28.58° C
कमाल तापमान : 28.85° C
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 80 %
वायू वेग : 3.77 Mps
स्थळ : Mumbai, IN
28.85° C
28.74°C - 31°C
light rain27.59°C - 30.51°C
moderate rain27.83°C - 30.56°C
light rain27.58°C - 30.98°C
light rain28.85°C - 30.65°C
scattered clouds28.65°C - 31.32°C
light rainनवी दिल्ली, (१५ मार्च) – अदानी मुद्यावरून केंद्र सरकारला घेरण्यासाठी विरोधी पक्षांनी बुधवारी अंमलबजावणी संचलनालयाच्या (ईडी) कार्यालयावर मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचा हा प्रयत्न सुरक्षा दलांनी हाणून पाडला. राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खडगे यांच्या नेतृत्वात विरोधी पक्षांनी विजय चौकातून हा मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला. यासाठी संसदभवनातून खडगे आणि अन्य नेते विजय चौकात पोहोचले. विजय चौकात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या भागात १४४ कलम लागू असल्यामुळे तुम्हाला मोर्चा काढता येणार नाही तसेच आंदोलनही करता येणार नाही, असे पोलिसांनी सांगितले. त्यामुळे विरोधी पक्षनेत्यांनी मोर्चा काढण्याचा प्रयत्न सोडून दिला.
अदानी समूहाच्या गैरव्यवहाराबाबत आम्ही ईडीच्या संचालकांना निवेदन देणार होतो, पण पोलिसांनी आम्हाला जाऊ दिले नाही, अडवून ठेवले, असा आरोप खडगे यांनी केला. अदानी समूहाने मोठा आर्थिक गैरव्यवहार केला, त्यामुळे स्टेट बँक तसेच एलआयसी बुडण्याच्या मार्गावर आली. विरोधी पक्षांच्या खासदारांचा मोर्चा अडवण्यासाठी २ हजार पोलिस तैनात करण्यात आले होते, हा विरोधी पक्षांच्या नेत्यांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न आहे, असा आरोप त्यांनी केला.
या मोर्चात तृणमूल काँग्रेस तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सहभागी झाले नव्हते. बाकी विरोधी पक्षांचे सदस्य हातात घोषणांचे पोस्टर्स घेऊन मोर्चात सहभागी होण्यासाठी आले होते. तत्पूर्वी आज सकाळी खडगे यांच्या दालनात या मोर्चाबाबत विरोधीपक्षनेत्यांची बैठक झाली होती.