किमान तापमान : 27.51° C
कमाल तापमान : 27.83° C
तापमान विवरण : clear sky
आद्रता : 77 %
वायू वेग : 2.77 Mps
स्थळ : Mumbai, IN
27.83° C
27.76°C - 30.55°C
sky is clear28.01°C - 30.97°C
sky is clear28.26°C - 30.45°C
scattered clouds27.82°C - 30.02°C
sky is clear27.66°C - 29.83°C
sky is clear27.67°C - 29.81°C
light rain-‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत पंतप्रधानांचे आवाहन,
नवी दिल्ली, (१२ ऑगस्ट) – स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील वर्षी ‘हर घर तिरंगा’ अभियान सुरू केले. याचाच एक भाग म्हणून पंतप्रधान मोदी यांनी यावर्षीही देशवासीयांना उद्या रविवारपासून तीन दिवस आपल्या घरांवर तिरंगा फडकविण्याचे आवाहन केले.
आपला तिरंगा राष्ट्रीय एकतेचे प्रतीक आहे. ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत नागरिकांनी आपल्या घरावर तिरंगा फडकवावा आणि त्याचा सेल्फी ‘हर घर तिरंगा’ या संकेतस्थळावर अपलोड करावा, असे आवाहन मोदी यांनी आपल्या ट्विटरवर केले आहे. गेल्यावर्षी या संकेतस्थळावर सहा कोटींवर नागरिकांनी तिरंग्यासोबतचा सेल्फी अपलोड केला होता. येत्या १५ तारखेला भारत स्वातंत्र्याची ७६ वर्षे पूर्ण करणार आहे. ‘हर घर तिरंगा’ अभियान स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सावाला नवी उर्जा देणारा आहे. देशवासीयांना हे अभियान यावर्षी एका नव्या उंचीवर घेऊन जायचे आहे. यासाठी १३ ते १५ ऑगस्ट या तीन दिवशी देशवासीयांनी ‘आन-बान आणि शान’ राखत राष्ट्रीय ध्वज आपल्या घरावर फडकवावा आणि याचा सेल्फी संकेतस्थळावर अपलोड करावा, असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केले आहे.