किमान तापमान : 31.07° C
कमाल तापमान : 32.99° C
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 75 %
वायू वेग : 5.56 Mps
स्थळ : Mumbai, IN
32.99° C
29.12°C - 32.99°C
few clouds29.33°C - 31.9°C
few clouds28.86°C - 31.58°C
sky is clear28.78°C - 30.34°C
broken clouds28.76°C - 30.2°C
scattered clouds28.59°C - 30.45°C
overcast cloudsविरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीत,
नवी दिल्ली, (३० जानेवारी) – सोमवारपासून सुरू होणारे संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन वादळी ठरण्याची चिन्हे आहेत. अधिवेशनात अदानी समूह, चीनची घुसखोरी, जाती आधारित जनगणना आणि महिला आरक्षणाच्या मुद्यांवरून सरकारला घेरण्याची तयारी विरोधी पक्षांनी केली आहे. राष्ट्रपती दौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणाने संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा प्रारंभ होणार आहे. पहिल्याच दिवशी संसदेत आर्थिक सर्वेक्षण सादर केले जाणार आहे. बुधवारी अर्थमंत्री निर्मला सीतारामन् अर्थसंकल्प सादर करणार आहेत.
अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. सरकारतर्फे या बैठकीला संरक्षण मंत्री राजनाथसिंह, वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल, संसदीय कामकाज राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांच्यासह काही मंत्री उपस्थित होते. विरोधी पक्षांचे प्रतिनिधित्व या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार, नॅशनल कॉन्फरन्सचे डॉ. फारुक अब्दुल्ला, आपचे संजयसिंह, द्रमुकचे के. टी. आर. बालू, अण्णाद्रमूकचे थंबीदुराई आणि तृणमूल काँग्रेसचे सुदीप बंदोपाध्याय यांनी केले.
आपचे संजयसिंह, राजदचे मनोज झा, द्रमुक आणि डाव्या पक्षांनी या बैठकीत अदानी समूहाचा मुद्दा उपस्थित करीत, यावर अर्थसंकल्पीय अधिवेशनात चर्चेची मागणी केली. वायएसआर काँग्रेसने आर्थिक परिस्थितीवर जाती आधारित जनगणनेची मागणी केली. देशात मागासवर्गीयांची संख्या ५० टक्क्यांच्या वर आहे. जाती आधारित जनगणना केल्यामुळे या लोकांच्या आर्थिक परिस्थितीचा अंदाज येऊ शकतो, असे वायएसआर काँग्रेसचे विजयसाई रेड्डी म्हणले. जदयू आणि राजदने जाती आधारित जनगणनेच्या मागणीला पाठिंबा दर्शवला. महिला आरक्षण विधयकाची मागणीही रेड्डी यांनी केली.
दोन टप्प्यांत होणार अधिवेशन
अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला टप्पा १३ फेब्रुवारीपर्यंत चालणार असून, दुसर्या टप्प्याला १३ मार्चपासून सुरुवात होईल. ६ एप्रिलपर्यंत चालणार्या या अधिवेशनात दोन्ही सभागृहांच्या २७ बैठकी होणार आहेत.