किमान तापमान : 30.19° C
कमाल तापमान : 31.39° C
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 68 %
वायू वेग : 4.7 Mps
स्थळ : Mumbai, IN
31.39° C
27.32°C - 31.99°C
sky is clear27.98°C - 31.12°C
sky is clear28.13°C - 30.39°C
few clouds27.9°C - 30.05°C
sky is clear27.63°C - 29.93°C
sky is clear27.75°C - 29.94°C
few cloudsनवी दिल्ली, (१२ ऑक्टोबर) – देशात एक देश एक निवडणूक योजना लागू करण्यावर उच्चस्तरीय समितीकडून विचारमंथन सुरू आहे. परंतु, या मुद्यावर सर्वसंमत न झाल्यास आपला निर्णय जनतेवर थोपवू नये, असे मत माजी मुख्य निवडणूक आयुक्त एस. वाय. कुरेशी यांनी व्यक्त केले. ‘एक्सपेरिमेंट विद डेमॉकॅसी: द लाईफ ऑफ ए नेशन थ्रू इट्स इलेक्शन्स’ या आपल्या नव्या पुस्तकासंदर्भात ते बोलत होते. देशात चालू वर्षाअखेर पाच विधानसभांची निवडणूक होत आहे.
यानंतर नव्या वर्षात देशपातळीवर लोकसभा निवडणूक नियोजित आहे. विद्यमान निवडणूक आयोगाने आचार संहिताचे उल्लंघन करणार्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी अपेक्षा माजी मुख्य निवडणूक आयुक्त कुरेशी यांनी व्यक्त केली. विविध राजकीय पक्षांकडून निवडणूक काळात मतदारांना मोफ त भेटवस्तूंचे आमिष दाखविण्यात येते. मात्र, या मुद्यावर निवडणूक आयोगच काय सर्वोच्च न्यायालयही काही करू शकले नाही. याशिवाय याच कालावधीत मोठ्या प्रमाणात संपत्तीचा गैरवापर होत असल्याचे अनेकदा आढळले असून, ठोस असा निष्कर्ष सरकारच्या हाती आलेला नाही, अशी टीकाही त्यांनी केली.