किमान तापमान : 29.92° C
कमाल तापमान : 31.97° C
तापमान विवरण : clear sky
आद्रता : 51 %
वायू वेग : 4.47 Mps
स्थळ : Mumbai, IN
31.97° C
29.18°C - 32.99°C
sky is clear29.15°C - 32.46°C
sky is clear28.48°C - 32.12°C
sky is clear27.63°C - 30.85°C
sky is clear27.53°C - 30.43°C
sky is clear27.47°C - 30.35°C
sky is clear– देशात सात राज्यांत सत्ताधारी,
नवी दिल्ली, (१४ मे) – कर्नाटकात काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाल्याने काँग्रेस पुन्हा एकदा देशपातळीवर सत्ताधारी पक्ष म्हणून पुढे येऊ शकतो, असा विश्वास विरोधी पक्षातील नेत्यांनी व्यक्त केला आहे. हिमाचल प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान या तीन राज्यांत काँग्रेसची एकहाती सत्ता आहे. कर्नाटकातही काँग्रेस लवकरच सत्ता स्थापन करेल. त्यामुळे एकहाती सत्ता असलेल्या राज्यांची संख्या ४ होईल. तर, इतर पक्षांसोबत आघाडी करून काँग्रेस तीन राज्यांत सत्तेवर आहे.
कर्नाटक निवडणूक निकाल हा त्याची नांदी असल्याचे अनेकांनी म्हटले आहे. ‘भारत जोडो यात्रे’मुळे मरगळ आलेल्या काँग्रेसला उभारी मिळाली. याचाच फायदा कर्नाटकात दिसून आल्याचे राजकीय तज्ज्ञ सांगत आहेत. यापुढे काँग्रेसला आणखी जोराने काम करावे लागणार असल्याचेही तज्ज्ञ सांगतात. दरम्यान, कधीकाळी सत्ताधारी असलेला काँग्रेस पक्ष मधल्या काही वर्षांत मागे पडला होता. परंतु, आता पुन्हा देशातील अनेक राज्यात काँग्रेस सत्ताधारी आहे. हिमाचल प्रदेशमध्ये डिसेंबर महिन्यात निवडणुका झाल्या होत्या. त्याच काळात राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सुरू होती. हिमाचल प्रदेशमध्येही काँग्रेसला चांगले यश मिळाले. सध्या सुखविंदरसिंग सुखू हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत.
छत्तीसगडमध्येही काँग्रेसची सत्ता असून, १७ डिसेंबर २०१८ पासून तिथे भूपेश बघेल मुख्यमंत्री आहेत. राजस्थानात अशोक गहलोत विरुद्ध सचिन पायलट यांच्यात फूट पडली असली तरी, काँग्रेसने येथे सत्ता कायम ठेवण्यात यश मिळवले आहे. १७ डिसेंबर २०१८ पासून अशोक गहलोत राजस्थानचे मुख्यमंत्री आहेत. तर, तामिळनाडू, बिहार आणि झारखंडमध्ये स्थानिक पक्षांसोबत आघाडी करून काँग्रेस या राज्यात सत्तेवर आहे. आता कर्नाटकात काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले असल्याने कर्नाटकातील पुढचा मुख्यमंत्री काँग्रेसचाच असणार आहे.