|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 06:02 | सूर्यास्त : 18:44
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 32.76° C

कमाल तापमान : 35.99° C

तापमान विवरण : clear sky

आद्रता : 36 %

वायू वेग : 10.09 Mps

स्थळ : Mumbai, IN

35.99° C

Weather Forecast for
Monday, 29 Apr

29.18°C - 35.99°C

sky is clear
Weather Forecast for
Tuesday, 30 Apr

28.97°C - 32.73°C

few clouds
Weather Forecast for
Wednesday, 01 May

28.47°C - 32.01°C

sky is clear
Weather Forecast for
Thursday, 02 May

27.81°C - 30.92°C

sky is clear
Weather Forecast for
Friday, 03 May

27.36°C - 30.03°C

sky is clear
Weather Forecast for
Saturday, 04 May

27.12°C - 30.03°C

sky is clear
Home » राजकीय, राष्ट्रीय » काँग्रेसचा रिमोट राहुल गांधींकडेच : गुलाम नबी आझाद

काँग्रेसचा रिमोट राहुल गांधींकडेच : गुलाम नबी आझाद

-खरगे फक्त नावाचेच अध्यक्ष,
नवी दिल्ली, (०५ एप्रिल) – काँग्रेस पक्षात निवडणुका होऊन मल्लिकार्जुन खरगे यांची अध्यक्षपदी निवड झाली असली, तरी ते केवळ नाममात्र आहेत; पक्षाचा रिमोट कंट्रोल आजही राहुल गांधी यांच्याच हातात आहे आणि तेच काँग्रेसचा कारभार चालवत आहेत, असा जोरदार हल्लाबोल राज्यसभेचे माजी सदस्य आणि डेमॉक‘ॅटिक आझाद पक्षाचे अध्यक्ष गुलाम नबी आझाद यांनी बुधवारी चढविला. ‘आझाद- एक आत्मचरित्र’ या आपल्या पुस्तकाच्या विमोचनाच्या अनुषंगाने आझाद यांनी आपल्या माजी सहकार्यांशी संबंधित अनेक मुद्यांवर भाष्य करण्यास नकार दिला. मी जितका भूतकाळात जाईल, तितक्याच वाईट गोष्टी समोर येतील. मी गेल्या वर्षीच पक्षाचा राजीनामा दिला असल्याने आता मला त्या गोष्टी समोर आणायच्या नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले.
माझ्या मनात आजही जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, संजय गांधी आणि राजीव गांधी यांच्याविषयी प्रचंड आदर आहे. मात्र, राहुल गांधी यांच्याबाबत माझे राजकीय मतभेद कायम आहेत. व्यक्ती म्हणून राहुल गांधी वाईट आहेत, असे मी म्हणणार नाही. ते चांगले व्यक्ती आहेत. मात्र, काँग्रेस पक्षात असेपर्यंत मी जे काही राजकीय आघाडीवर अनुभवले आहे, त्यावरून माझे त्यांच्यासोबत मतभेद आहेत. आता मी त्यांच्या पक्षात नसल्याने, त्यांच्यासाठी काय चांगले आणि काय वाईट आहे, हे मी त्यांना सांगू शकत नाही, असे आझाद यांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.
मी केवळ त्यांना आरोग्य आणि राजकीयविषयक मुद्यांवर शुभेच्छा देऊ शकतो. उफाळलेल्या पाण्यातही स्वत:ला कसे सुरक्षित ठेवावे, याचे कौशल्य एका चांगल्या नावाड्याकडे असते. मला असे वाटते की, राहुल गांधी हेदेखील पक्षातील वादळात स्वत:चे रक्षण करतील, अशी आशा आझाद यांनी व्यक्त केली.
जहाजाचे खरे कॅप्टन राहुल गांधीच
काँग्रेसरूपी जहाजाची सूत्रे मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे आहेत, असे आपल्याला दिसत असले तरी, ते सत्य नाही. या जहाजाचे खरे कॅप्टन हे राहुल गांधीच आहेत आणि त्यांच्या आदेशावरूनच पक्षाचा कारभार सुरू आहे, असे गुलाम नबींनी सांगितले.

Posted by : | on : 5 Apr 2023
Filed under : राजकीय, राष्ट्रीय
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g