किमान तापमान : 28.68° C
कमाल तापमान : 28.89° C
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 81 %
वायू वेग : 5.95 Mps
स्थळ : Mumbai, IN
28.89° C
28.79°C - 29.92°C
sky is clear28.31°C - 29.9°C
sky is clear28.18°C - 29.79°C
sky is clear27.85°C - 29.19°C
sky is clear28.08°C - 29.61°C
few clouds28.1°C - 29.3°C
few cloudsनवी दिल्ली, (१४ ऑगस्ट) – काँग्रेसचे नेते रणदीप सुर्जेवाला यांनी केलेल्या वादग‘स्त वक्तव्यावर भाजपाने पलटवार केला आहे. काँग्रेसने केवळ मतदारांना शिव्याच दिल्या नाहीत तर, त्यांना शापही दिला आहे. काँग्रेसने सर्व मर्यादा ओलांडल्या असून, नागरिक कुणाला शाप देतील आणि कुणाला आशीर्वाद हे २०१४ मधील लोकसभा निवडणुकीत स्पष्ट होईल, असे भाजपाचे प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी म्हटले.
रणदीप सुर्जेवाला अफजल गुरूला गुरुजी म्हणतात आणि त्यांच्या पक्षाचे नेते ओसामाजी हाफीज सईद साहब म्हणतात. काँग्रेसचे हे नेते आता देशातील नागरिकांना, मतदारांना शिव्या देत आहेत. लोकशाहीच्या मंदिरावर अशा प्रकारचा आक्षेप घेणारा काँग्रेस पक्ष लोकशाही संस्थांवर प्रश्न उपस्थित करतो. विदेशात जाऊन लोकशाहीचा मृत्यू झाल्याचे, भारतमातेची हत्या झाल्याचे हा पक्ष म्हणतो. जे नागरिक मतदान करतात, ते राक्षसी प्रवृत्तीचे असल्याचे रणदीप सुर्जेवाला आता म्हणतात. भाजपाला पाठिंबा देणार्यांना आम्ही जनता-जनार्दन मानतो, असे पूनावाला यांनी सांगितले.
अहंकार्यांकडून होतोय् लोकांचा अपमान : गौरव भाटिया
लोकांचा अपमान अहंकारी कशाप्रकारे करीत आहे, ते नागरिकांना दिसत आहे. राक्षसी प्रवृत्ती या अहंकार्यांमध्ये असते, हेच दिसत आहे. या सर्व गोष्टी राहुल गांधी यांच्या इशार्यावरून होत असल्याचे समजून घेणे आवश्यक आहे, अशी टीका भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते गौरव भाटिया यांनी केली.