किमान तापमान : 32.75° C
कमाल तापमान : 36.99° C
तापमान विवरण : clear sky
आद्रता : 32 %
वायू वेग : 6.62 Mps
स्थळ : Mumbai, IN
36.99° C
29.2°C - 36.99°C
sky is clear29.22°C - 32.92°C
few clouds28.74°C - 32.24°C
sky is clear28°C - 30.52°C
sky is clear27.57°C - 30.43°C
sky is clear27.44°C - 30.2°C
sky is clearउदलगुरी (आसाम), (०३ एप्रिल) – दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल भ्याड असून, त्यांची वीरता केवळ दिल्लीच्या विधानसभेपर्यंतच मर्यादित असल्याचा टोला आसामचे मुख्यमंत्री हेमंता बिस्वा सरमा यांनी लगावला. गुवाहाटी येथे केलेल्या टिप्पणीबद्दल केजरीवाल यांच्यावर त्यांनी टीका केली. केजरीवाल यांनी दिल्ली विधानसभेत आपल्यावरील केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांचा कोणताही संदर्भ त्यांच्या भाषणात न दिल्याबद्दल सरमा यांनी टीका केली. त्यांनी दिल्ली विधानसभेत माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. परंतु मी त्यांच्यावर कारवाई करू शकत नाही; कारण त्यांना तेथे विशेषाधिकाराने संरक्षण दिले जाते. तेच आरोप त्यांनी सभागृहाबाहेर पुन्हा केल्यास मी त्यांना न्यायालयात भेटेन, असे आव्हान मी त्यांना दिले होते, असे सरमा यांनी रविवारी पत्रपरिषदेत सांगितले.
गुवाहाटीच्या सभेत केजरीवाल यांच्यासोबत पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान देखील उपस्थित होते. सभेत केजरीवाल यांनी दिल्ली सरकारने दिलेल्या नोकर्यांबद्दल आकडेवारी सादर केली होती. त्यावर हेमंत सरमा म्हणाले की, त्यांची आकडेवारी चुकीची आहे आणि दिल्लीत ६० टक्के नागरिक नरकात जगत आहेत.
मी दिल्लीतील अधिकार्यांशी बोललो. त्यांनी मला सांगितले की, दिल्ली सरकारच्या अंतर्गत १.५० लाख सरकारी पदे मंजूर आहेत. मी उद्या केजरीवाल यांनी कोणत्या विभागात किती नोकर्या दिल्या, याच्या तपशीलवार माहितीसाठी पत्र लिहीन आणि त्यानंतर आमच्या सरकारने दिलेल्या रोजगाराचा तपशीलही मी जाहीर करणार असल्याचे सरमा म्हणाले. आसाममध्ये आम आदमी पार्टी सत्तेवर आल्यास मोफत वीज देण्याच्या केजरीवालांच्या आश्वासनाची सरमा यांनी खिल्ली उडवली. ते म्हणाले की, ईशान्येकडील राज्यात ‘ओरुनुडोई’ योजना आहे, त्या अंतर्गत सरकार आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या कुटुंबांच्या बँक खात्यात दरमहा १४०० रुपये जमा करते.