|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 05:59 | सूर्यास्त : 18:46
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 30.19° C

कमाल तापमान : 31.99° C

तापमान विवरण : few clouds

आद्रता : 70 %

वायू वेग : 4.7 Mps

स्थळ : Mumbai, IN

31.99° C

Weather Forecast for
Sunday, 05 May

27.32°C - 31.99°C

sky is clear
Weather Forecast for
Monday, 06 May

27.98°C - 31.12°C

sky is clear
Weather Forecast for
Tuesday, 07 May

28.13°C - 30.39°C

few clouds
Weather Forecast for
Wednesday, 08 May

27.9°C - 30.05°C

sky is clear
Weather Forecast for
Thursday, 09 May

27.63°C - 29.93°C

sky is clear
Weather Forecast for
Friday, 10 May

27.75°C - 29.94°C

few clouds
Home » राष्ट्रीय, संरक्षण » कोणत्याही स्थितीचा सामना करण्यासाठी तत्पर : लष्करप्रमुख

कोणत्याही स्थितीचा सामना करण्यासाठी तत्पर : लष्करप्रमुख

नवी दिल्ली, १५ जानेवारी – प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील ‘जैसे थे’ स्थिती बदलविण्याचा प्रयत्न आम्ही नेहमीच हाणून पाडू. भारतीय लष्कराने यापूर्वी अनेकदा तसा स्पष्ट संदेश दिला आहे. सीमेवर अचानक उद्भवणार्‍या कोणत्याही स्थितीचा सामना करण्यासाठी आपले लष्कर सदैव तत्पर आहेत, असा स्पष्ट आणि कठोर संदेश लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी आज शनिवारी अप्रत्यक्षरीत्या आपल्या शेजारी राष्ट्रांना दिला.
लष्कर दिन परेडनिमित्त जवान आणि अधिकार्‍यांना संबोधित करताना जनरल नरवणे यांनी चीनसोबतच पाकिस्तानलाही एक प्रकारे इशाराच दिला आहे. मागील वर्ष भारतीय लष्करासाठी कठीण आव्हानांचे ठरले होते, असे सांगताना त्यांनी, चीनसोबतच्या उत्तर सीमेवर घडलेल्या काही मोठ्या घडामोडींचा संदर्भ दिला. विशेषत: लडाख सीमेवरील घडामोडी महत्त्वाच्या होत्या. भारतीय लष्कराने या सीमेवर चीनचे सर्वच प्रयत्न उधळून लावले.
सीमेवरील स्थितीत कुठलाही बदल होणार नाही, नेहमीच शांतता राहावी, यासाठी दोन्ही देशांच्या लष्करी कमांडर्स पातळीवर अलिकडेच चर्चेची चौदावी फेरी झाली, असे त्यांनी सांगितले. पाकिस्तानसंदर्भात लष्करप्रमुख म्हणाले की, राज्यप्रायोजित दहशतवादाचा आणखी सामना करण्यासाठी संस्थात्मक यंत्रणा आणि सुरक्षा उपाय अधिक मजबूत केले आहेत. दहशतवादाच्या उगमस्थानावरच थेट हल्ला करण्याची आमची क्षमता संपूर्ण जगाने अनुभवली आहे.
राष्ट्रपती, पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा
राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांनी लष्कर दिनानिमित्त लष्करी अधिकारी आणि जवानांना शुभेच्छा दिल्या. सर्वच प्रकारच्या स्थितीत देशाच्या सीमांचे रक्षण करण्यात नेहमीच आघाडीवर असलेल्या जवानांचा भारतवासी नेहमीच ऋणी राहील, असे ट्विट राष्ट्रपतीनी केले. भारतीय लष्कर जगात त्यांच्या पराक्रमासाठीच ओळखले जाते, असे ट्विट पंतप्रधानांनी केले.

Posted by : | on : 15 Jan 2022
Filed under : राष्ट्रीय, संरक्षण
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g