|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 05:54 | सूर्यास्त : 18:51
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 31.08° C

कमाल तापमान : 31.99° C

तापमान विवरण : scattered clouds

आद्रता : 79 %

वायू वेग : 3.95 Mps

स्थळ : Mumbai, IN

31.99° C

Weather Forecast for
Sunday, 19 May

29.12°C - 31.99°C

scattered clouds
Weather Forecast for
Monday, 20 May

29.16°C - 31.86°C

sky is clear
Weather Forecast for
Tuesday, 21 May

28.87°C - 31.44°C

sky is clear
Weather Forecast for
Wednesday, 22 May

29.04°C - 30.28°C

scattered clouds
Weather Forecast for
Thursday, 23 May

28.88°C - 30.36°C

overcast clouds
Weather Forecast for
Friday, 24 May

28.42°C - 30.44°C

overcast clouds
Home » अर्थ, राष्ट्रीय » कोरोनामुळे झालेले नुकसान भारताने वेगाने भरून काढले

कोरोनामुळे झालेले नुकसान भारताने वेगाने भरून काढले

अर्थमंत्रालयाकडून अहवाल सादर,
नवी दिल्ली, १२ डिसेंबर – गेल्या दोन वर्षांपासून जगावर कोरोनाचे संकट आहे. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसर्‍या लाटेत लावण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे अर्थव्यवस्था पूर्णपणे ठप्प झाली होती. मात्र, आता जगावरील कोरोनाचे सावट हळूहळू कमी होताना दिसत आहे. कोरोनाबाधितांची संख्याही कमी झाली असून, लसीकरणाला वेग आला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा उद्योगधंदे नव्या जोमाने सुरू झाले आहेत. टाळेबंदीत शिथिलता देण्यात आल्याने अर्थव्यवस्थेला चालना मिळाली आहे. कोरोनाच्या सावटातून बाहेर पडून ज्या देशांच्या अर्थव्यवस्थेमध्ये मोठ्याप्रमाणात सुधारणा झाली, अशा काही निवडक देशांमध्ये भारताचा समावेश आहे. दिलासादायक गोष्ट म्हणजे, भारतात लसीकरणाचे प्रमाण झपाट्याने वाढत असल्यामुळे, कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉनचा देशाला फारसा धोका नसल्याचे आरोग्य तज्ज्ञांनी म्हटले आहे.
अर्थमंत्रालयाने मासिक अहवालात सादर केलेल्या आकडेवारीनुसार, चालू आर्थिक वर्षाच्या दुसर्‍या तिमाहीत भारताचा जीडीपी ८.४ टक्के इतका राहिला आहे. याचाच अर्थ मागील आर्थिक वर्षांच्या तुलनेत अर्थव्यवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा झाली आहे. देशाचा जीडीपी चालू तिमाहीत कोरोनापूर्व काळाच्या जवळपास पोहोचला आहे. या अहवालात असे म्हटले आहे की, देश हळूहळू कोरोनाच्या संकटातून बाहेर येत असून, अर्थव्यवस्थेच्या वृद्धीसाठी हे सकारात्मक संकेत आहेत. ज्या देशांनी कोरोनाच्या संकटातून बाहेर पडत अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याचा प्रयत्न केला, अशा काही निवडक देशांमध्ये भारताचा समावेश झाला आहे. टाळेबंदीनंतर कृषी, आयटी आणि इतर सेवा सेत्रांमध्ये तेजी आली असल्याचे या अहवालात म्हटले आहे.
लसीकरणामुळे अर्थव्यवस्थेला बळकटी
कोरोना लसीकरण भारतातील उद्योगांसाठी संजीवनी ठरले आहे. ज्या प्रमाणात लसीकरणाचा वेग वाढला, त्याच प्रमाणात उद्योगांनी भरारी घेतली. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीपासून उद्योग पूर्ण क्षमतेने सुरू झाले आहेत. त्याचा परिणाम हा आपल्याला दुसर्‍या तिमाहीमध्ये पहायला मिळत आहे. देशाचा जी़डीपी चालू तिमाहीत ८.४ टक्क्यांवर पोहोचला असल्याचे या अहवालात म्हटले आहे, दरम्यान, एप्रिलपर्यंत जीडीपी ९ टक्क्यांच्या आसपास पोहोचू शकतो, असा अंदाज भारतीय रिझर्व्ह बँकेकडून वर्तवण्यात आला आहे.

Posted by : | on : 12 Dec 2021
Filed under : अर्थ, राष्ट्रीय
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g