किमान तापमान : 30° C
कमाल तापमान : 30.18° C
तापमान विवरण : clear sky
आद्रता : 63 %
वायू वेग : 5.54 Mps
स्थळ : Mumbai, IN
30° C
27.32°C - 30.26°C
sky is clear27.98°C - 31.12°C
sky is clear28.13°C - 30.39°C
few clouds27.9°C - 30.05°C
sky is clear27.63°C - 29.93°C
sky is clear27.75°C - 29.94°C
few cloudsभारतीय जवानांनी ‘ड्रॅगन’ला पिटाळले,
इटानगर, २ जानेवारी –
चिनी लष्करातील सैनिकांनी भारताच्या अरुणाचल प्रदेशमधील हद्दीत शिरून आगेकूच करण्याचा प्रयत्न केला. मात्र, भारतीय जवानांनी जोरदार हरकत घेतली आणि ‘खबरदार, एक पाऊल आणखी पुढे टाकाल तर,’ अशी थेट धमकी देत चिनी सैनिकांना पिटाळून लावले.
या घटनेचा व्हिडीओही समाजमाध्यमांतून व्हायरल झाला आहे. भारतीय जवानांचे मनोबल चिनी सैनिकांच्या तुलनेत किती तरी जास्त असल्याचे या व्हिडीओतून अधोरेखित झाले. भारतीय लष्कर वा संरक्षण मंत्रालयातर्फे या घटनेबद्दल कुठलेही अधिकृत वक्तव्य करण्यात आले नाही. केंद्र सरकारने सीमेवरील जवानांना आपत्कालीन स्थितीत स्वयंनिर्णयाचे अधिकार दिले आहेत, यातच सगळे आले.
अरुणाचल प्रदेशातील बुम ला व्हॅली भागात १९६२ च्या भारत-चीन युद्धात चिनी आणि भारतीय लष्करात भीषण रणसंग्राम झाला आहे. आता या भागात आयटीबीपीचे (इंडो-तिबेटियन बॉर्डर पोलिस) जवान अहोरात्र चिन्यांच्या हालचालींवर नजर ठेवून असतात. अरुणाचलमध्ये चीनची आगळीक गेल्या काही दिवसांत पुन्हा वाढलेली आहे. अरुणाचलला आपल्या नकाशात दाखवणे, अरुणाचलातील ठिकाणांची नावे बदलणे, वास्तविक नियंत्रण रेषेलगत आपल्या हद्दीत गावे वसविणे आदी प्रकार चीनकडून सातत्याने सुरू आहेत.
डरकाळीमुळे थांबली गुरगुर
अलिकडेच घडलेल्या या घटनेत भारत आणि चीनचे जवान जेव्हा समोरसमोर आले, तेव्हा सुरुवातीला चिनी सैनिकांनी गुरगुर केली; पण भारतीय जवानांनी त्यांना डरकाळीने उत्तर देताच अक्षरश: घाबरून आणि असहाय्यपणे चिनी सैनिक मागे सरकले.