किमान तापमान : 29.72° C
कमाल तापमान : 30.99° C
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 79 %
वायू वेग : 5.21 Mps
स्थळ : Mumbai, IN
30.99° C
28.72°C - 31.5°C
overcast clouds28.24°C - 30.77°C
overcast clouds28.45°C - 30.45°C
scattered clouds28.46°C - 30.08°C
broken clouds28.57°C - 30.43°C
light rain28.51°C - 30.58°C
light rainआयटी उद्योगांना दिलासा देण्यासाठी केंद्राचे पाऊल,
नवी दिल्ली, ६ नोव्हेंबर – ‘बिझनेस प्रोसेस आउटसोअर्सिंग’ आणि माहिती तंत्रज्ञनावर आधारित सेवा देणार्या कंपन्यांसाठी घरून काम करण्यासंदर्भातील मार्गदर्शक तत्त्वांमध्ये शिथिलता आणण्याचा निर्णय घेतला आहे. आयटी उद्योगाला दिलासा देण्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
नोंदणी आणि अनुपालनासंबंधीचे नियम शिथिल झाल्यानंतर कायमस्वरूपी ‘वर्क फ्रॉम होम’ सुविधा अधिक सोपी होणार आहे. घरातून किंवा कुठूनही काम करण्यासाठी पोषक वातावरण निर्माण होईल. वेळोवेळी कामाबाबत प्रमुखांना द्यावी लागणारी माहिती आणि अन्य जबाबदार्यांमध्ये देखील शिथिलता येणार आहे, असे सूत्रांनी सांगितले.
माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील उद्योगांना बळकटी देणे, हाच यामागील मुख्य उद्देश आहे. या उद्योगांकडून दीर्घकाळापासून घरून काम करण्याच्या नियमता शिथिलता आणण्याची मागणी होत आहे. ही प्रथा कायमस्वरूपी अंमलात आणण्याची शक्यता असल्याचे सूत्रांचे मत आहे. अनेक कंपन्या दूरसंचार संसाधनांच्या माध्यमातून ऍप्लिकेशन आणि आयटी क्षेत्राशी संबंधित सेवा किंवा अन्य प्रकारच्या आऊटसोअर्सिंग सेवा प्रदान करतात. या कंपन्यांना आयटी, कॉल सेंटर, बीपीओ आणि नॉलेज प्रोसेस आउटसोअर्सिंग कंपन्या असे म्हटले जाते. या नव्या धोरणामुळे आता केवळ घरूनच नव्हे, तर देशात कुठूनही काम करण्याच्या प्रक्रियेला प्रोत्साहन मिळणार आहे. मात्र, अशा प्रकारे विस्तारित योजनेतून काम करण्यासाठी काही अटी आणि नियमही असणार आहेत, असे सूत्रांनी सांगितले.