किमान तापमान : 28.91° C
कमाल तापमान : 29.99° C
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 84 %
वायू वेग : 3.81 Mps
स्थळ : Mumbai, IN
29.99° C
27.32°C - 30.2°C
sky is clear27.94°C - 31.58°C
sky is clear28.2°C - 30.44°C
sky is clear27.88°C - 30.21°C
few clouds27.63°C - 29.87°C
sky is clear27.53°C - 29.77°C
sky is clearनवी दिल्ली, १२ डिसेंबर – पाकिस्तानविरोधात १९७१ मध्ये लढल्या गेलेले थेट युद्ध भारताने सहजपणे जिंकले होते. त्यानंतर पाकिस्तानने दहशतवादाच्या माध्यमातून छुपे युद्ध सुरू केले आहे. या युद्धातही आपण पाकिस्तानचा निश्चितच पराभव करू, असा विश्वास संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांनी आज रविवारी व्यक्त केला.
ब्रिटिशांच्या राजवटीत धर्माच्या नावावर भारताची झालेली फाळणी ऐतिहासिक चूक होती, हेच १९७१ च्या युद्धातून स्पष्ट झाले आहे. थेट युद्धात आपण भारताचा पराभव करू शकत नाही, याची वारंवार खात्री पटल्यानंतर पाकिस्तानने दहशतवादाच्या माध्यमातून छुपे युद्ध सुरू केले. भारतविरोधी कारवाया पाकी कुरापतींचा नित्याचाच भाग झाल्या आहेत, असे राजनाथसिंह यांनी ‘स्वर्णिम विजय पर्व’च्या उद्घाटनीय सोहळ्याला संबोधित करताना सांगितले.
१९७१ च्या युद्धात पाकिस्तानचे सर्वच डावपेच भारतीय जवानांनी अपयशी ठरविले होते. आता आपले जवान पाकपुरस्कृत दहशतवादही हाणून पाडत आहेत. पाकिस्तानच्या या छुप्या युद्धातही भारताचाच विजय होईल, असा मला विश्वास असल्याचे राजनाथसिंह म्हणाले.
स्वर्णिम विजय पर्व साधेपणाने साजरे होणार
सीडीएस जनरल बिपीन रावत यांचे स्मरण करीत राजनाथसिंह यांनी आदरांजली वाहिली. भारत-पाकिस्तानमध्ये झालेल्या १९७१ च्या युद्धाला यंदा ५० वर्ष पूर्ण होत आहे. या विजयाचा स्वर्णिम विजय पर्व साधेपणाने साजरा होणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
स्वर्णिम विजय पर्व १२ ते १४ डिसेंबर या दरम्यान साजरा करण्यात येणार आहे. आज झालेल्या कार्यक्रमात राजनाथसिंह यांनी म्हटले की, इंडिया गेट येथे भारत-पाकिस्तान युद्धाच्या ‘स्वर्णिम विजय वर्षा’च्या अंतर्गत आयोजित करण्यात आलेला विजय पर्व साजरा करण्यास एकत्र आलो आहोत. हा दिवस भारतीय लष्कराच्या संस्मरणीय विजयासाठी आहे. भारतीय सैन्याने दक्षिण आशियाचा इतिहास आणि भूगोल बदलून टाकला. या विजय पर्वात देशातील सामान्य जनतेला सहभागी करून घेत असल्याबद्दल त्यांनी म्हटले की, या युद्धातील विजयापासून सामान्य नागरिक प्रेरणा घेतील. १९७१ च्या युद्धाबाबत माहिती देण्यासाठी, देशातील सैन्याच्या वाढलेल्या सामर्थ्याची माहिती देण्यासाठी प्रदर्शन आयोजित केले आहे.