किमान तापमान : 29.43° C
कमाल तापमान : 31.8° C
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 55 %
वायू वेग : 5.89 Mps
स्थळ : Mumbai, IN
31.8° C
28.39°C - 32.99°C
sky is clear29.14°C - 33.01°C
sky is clear28.93°C - 32.9°C
sky is clear28.76°C - 32.34°C
sky is clear27.89°C - 30.45°C
few clouds27.53°C - 29.91°C
sky is clear-बेरोजगारी घटली, जीएसटी संकलनात वाढ,
नवी दिल्ली, (०३ ऑक्टोबर) – पुढील वर्षी लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. यादृष्टीने केंद्र सरकार उपाययोजना करीत आहे. या उपाययोजनांचे चांगले परिणाम दिसू लागले आहेत. केंद्रातील भाजपा सरकारसाठी ऑक्टोबर महिन्याची सुरुवात चांगली झाली आहे आणि पहिल्या तीन दिवसांत शुभवार्ता मिळाल्या आहेत.
पहिली बातमी म्हणजे, जीएसटी संकलनात झालेली प्रचंड वाढ. दुसरी म्हणजे, बेरोजगारीचा दर ७.०९ टक्क्यांंवर आला. याशिवाय, जागतिक संस्था आणि तज्ज्ञ भारतीय अर्थव्यवस्थेबद्दल सकारात्मक आहेत आणि तिची गती कायम राहण्याची अपेक्षा करीत आहेत. भारतातील बेरोजगारीचा दर एका वर्षातील नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. ऑगस्ट महिन्याच्या तुलनेत एक टक्क्याहून अधिक घट झाली आहे. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीच्या आकडेवारीनुसार, देशातील बेरोजगारीचा दर ऑगस्टमध्ये ८.१० टक्के होता, तर सप्टेंबर २०२३ मध्ये तो ७.०९ टक्क्यांवर आला आहे. ग्रामीण बेरोजगारी ऑगस्टमधील ७.११ टक्क्यांवरून सप्टेंबरमध्ये ६.२० टक्क्यांपर्यंत घसरली. याच कालावधीत शहरी बेरोजगारीचा दर १०.०९ टक्क्यांवरून ८.९४ टक्क्यांवर आला.
जीएसटी संकलनात मोठी वाढ झाल्याचे दिसत आहे. सप्टेंबरच्या जीएसटी संकलनाचे आकडे जाहीर करताना वित्त मंत्रालयाने सांगितले की, भारतातील एकूण जीएसटी संकलन वार्षिक आधारावर १० टक्के वाढीसह १.६२ लाख कोटी रुपये आहे. चालू आर्थिक वर्षात जीएसटीमुळे सरकारी तिजोरी सातत्याने भरत आहे. सप्टेंबरमध्ये संकलन १,६२,७१२ कोटी रुपये होते, ज्यात केंद्रीय जीएसटी २९,८१८ कोटी रुपये, राज्य जीएसटी ३७,६५७ कोटी रुपये होते. याशिवाय एकात्मिक जीएसटी ८३,६२३ कोटी रुपये (माल आयातीवर जमा केलेल्या ४१,१४५ कोटी रुपयांसह) आणि सेस ११,६१३ कोटी रुपये (माल आयातीवर जमा केलेल्या ८८१ कोटी रुपयांसह) होता. बेरोजगारी घटण्याच्या आणि जीएसटी संकलनात वाढ होण्याच्या शुभवार्तांचा आनंद कमी झाला की काय म्हणून भारताच्या अर्थव्यवस्थेचा वेग कायम राहील, असे अर्थतज्ज्ञांनी म्हटले आहे.
सर्व जण भारताच्या आर्थिक विकासाबद्दल सकारात्मक आहेत. नीती आयोगाचे माजी उपाध्यक्ष राजीव कुमार यांनी चालू आर्थिक वर्षातील देशाच्या आर्थिक विकास दराबाबत आपला अंदाज व्यक्त केला असून तो अंदाजे ६.५ टक्के असेल. ते म्हणाले की, पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली गेल्या ९ वर्षांत झालेल्या सुधारणांचा देशाच्या स्थूल आर्थिक स्थितीला फायदा होत आहे.