|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 05:54 | सूर्यास्त : 18:51
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 30.07° C

कमाल तापमान : 32.02° C

तापमान विवरण : few clouds

आद्रता : 76 %

वायू वेग : 1.81 Mps

स्थळ : Mumbai, IN

32.02° C

Weather Forecast for
Sunday, 19 May

29.13°C - 32.99°C

sky is clear
Weather Forecast for
Monday, 20 May

28.81°C - 31.29°C

sky is clear
Weather Forecast for
Tuesday, 21 May

28.62°C - 30.72°C

sky is clear
Weather Forecast for
Wednesday, 22 May

28.55°C - 29.71°C

few clouds
Weather Forecast for
Thursday, 23 May

28.63°C - 29.55°C

broken clouds
Weather Forecast for
Friday, 24 May

28.39°C - 29.39°C

overcast clouds
Home » राष्ट्रीय, संरक्षण » तोयबाच्या कमांडरसह तीन अतिरेक्यांचा खात्मा

तोयबाच्या कमांडरसह तीन अतिरेक्यांचा खात्मा

सुरक्षा जवानांची मोठी कामगिरी,
श्रीनगर, १६ ऑक्टोबर – सुरक्षा दलाच्या जवानांनी जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात आज शनिवारी लष्कर-ए-तोयबाच्या वरिष्ठ कमांडरसह तीन अतिरेर्‍यांचा चकमकीत खात्मा केला. याच वर्षीच्या सुरुवातीला दोन पोलिसांवर झालेल्या हल्ल्यात या अतिरेक्यांचा सहभाग होता.
उमर मुश्ताक खांडे असे या कमांडरचे नाव असून, काश्मीर खोर्‍यातील अनेक हल्ल्यांच्या कटातही तो सहभागी होता. उमर आपल्या काही साथीदारांसह पांपोरा येथील द्रंगबाल येथे आला असल्याची माहिती मिळाल्यानंतर जवानांनी संयुक्त मोहीम हाती घेऊन परिसराला वेढा घेतला. जवानांनी त्यांना शरण येण्यास सांगितले, पण तसे न करता अतिरेक्यांनी गोळीबार केला. यावेळी ही चकमक झडली.
जेसीओसह दोन जवान हुतात्मा
पूंछ जिल्ह्यातील नियंत्रण रेषेजवळील जंगलात अतिरेक्यांनी बुधवारी सुरक्षा दलावर घात लावून हल्ला केला होता. या हल्ल्यानंतर जेसीओसह दोन जवान बेपत्ता होते. ते हुतात्मा झाले असून, त्यांचे मृतदेह आज शनिवारी आढळले आहेत. अतिरेक्यांनी सोमवारी केलेल्या हल्ल्यात जेसीओसह पाच जवान हुतात्मा झाले होते. त्यानंतर सुरक्षा दलाने हाती मोहीम घेऊन अतिरेक्यांचा खात्मा सुरू केला. या चकमकी झडत असतानाच बुधवारी अतिरेक्यांनी सुरक्षा दलाच्या एका पथकावर घात लावून हल्ला केला होता. त्यानंतर हे दोघेही बेपत्ता झाले होते. ते दोघेही उत्तराखंडातील रहिवासी होते. घ(वृत्तसंस्था)
खोर्‍यात दोन गैरकाश्मिरींची हत्या
सुरक्षा दलाने अतिरेक्यांचा खात्मा केल्याने खवळलेल्या अतिरेकी संघटनांनी आज शनिवारी श्रीनगर आणि पुलवामा येथे दोन गैरकाश्मिरी नागरिकांची हत्या केली. श्रीनगर येथे बिहारच्या अरविंदकुमार साह यांची, तर पुलवामात उत्तरप्रदेशातील सागिर अहमद यांची हत्या अतिरेक्यांनी केली. दोन वेगवेगळ्या ठिकाणी गैरकाश्मिरी कामगारांवर अतिरेक्यांनी हल्ला केल्याची माहिती काश्मीर झोन पोलिसांनी दिली. पहिला हल्ला श्रीनगरमध्ये करण्यात आला. यात अरविंदकुमार यांची हत्या करण्यात आली. पुलवामा येथे अतिरेक्यांनी उत्तरप्रदेशातील रहिवासी सागिर अहमद यांची हत्या केली.

Posted by : | on : 17 Oct 2021
Filed under : राष्ट्रीय, संरक्षण
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g