किमान तापमान : 28.56° C
कमाल तापमान : 30.18° C
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 81 %
वायू वेग : 2.22 Mps
स्थळ : Mumbai, IN
30.18° C
28.29°C - 30.99°C
overcast clouds28.45°C - 30.22°C
scattered clouds28.55°C - 29.67°C
broken clouds28.49°C - 30.14°C
broken clouds28.53°C - 30.25°C
light rain28.93°C - 29.93°C
light rain-४५ मतदारसंघांमध्ये पंतप्रधान मोदी यांची रॅली,
नवी दिल्ली, (१० मार्च) – आगामी लोकसभा निवडणुकीला अद्याप १४ महिने शिल्लक असतानाही अन्य पक्षांच्या तुलनेत भारतीय जनता पार्टीने अप्रत्यक्ष रीत्या प्रचार सुरू केला आहे. यात मागील वेळी विजयापासून निसटलेल्या १६० लोकसभा मतदारसंघांवर विशेष लक्ष केंद्रित करण्याचे नियोजन केले आहे. सूत्रांनुसार, मागील लोकसभा निवडणुकीत भाजपाला १६० मतदारसंघांमध्ये पराभव स्वीकारावा लागला होता. आता पक्षाकडून या सर्व जागांवर विजय मिळविण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.
राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी याठिकाणच्या प्रचारासाठी विशेष रणनीती तयार केली असून, ते १६० जागांचा सर्वकष आढावा घेत आहेत. या जागा जिंकण्यासाठी भाजपाने ४० विशेष क्षेत्र (क्लस्टर) तयार केले असून, यात चार मतदारसंघांचा समावेश केला आहे. १६० पैकी ४५ पेक्षा अधिक जागांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रॅली आयोजित करण्यात येतील. या सर्व रॅली भूमिपूजन किंवा उद्घाटन कार्यक्रमांदरम्यान आयोजित होईल. पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस सुनील बन्सल, विनोद तावडे आणि तरुण चुग यांच्यावर पंतप्रधानांच्या रॅलीच्या आयोजनाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. याशिवाय उपरोक्त जागा दोन गटांत विभाजित करण्यात आल्या असून, एका गटावर अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि उर्वरित ८० जागांवर कें द्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या सभा पार पडतील.
लोकप्रियतेचा फायदा
भाजपाने पुढील निवडणुकीसाठीच्या प्रचारातही पंतप्रधान मोदी यांच्या संपूर्ण लोकप्रियतेचा फायदा घेण्याचे निश्चित केले आहे. त्यानुसार आगामी लोकसभा निवडणुकी अगोदर देशभरात त्यांच्या रॅली आयोजित करण्याची योजना आखण्यात आली आहे. तसेच, बिहार आणि तेलंगणा या दोन राज्यांवर विशेष लक्ष ठेवण्यात आले आहे.