किमान तापमान : 32.75° C
कमाल तापमान : 32.91° C
तापमान विवरण : clear sky
आद्रता : 49 %
वायू वेग : 6.62 Mps
स्थळ : Mumbai, IN
32.91° C
29.3°C - 32.99°C
sky is clear29.22°C - 32.92°C
few clouds28.74°C - 32.24°C
sky is clear28°C - 30.52°C
sky is clear27.57°C - 30.43°C
sky is clear27.44°C - 30.2°C
sky is clear– गृहमंत्री अमित शाह यांचे प्रतिपादन,
– दहशतवाद विरोधी परिषद,
नवी दिल्ली, (०५ ऑक्टोबर) – दहशतवादाची पाळेमुळे खोदण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी अत्यंत कठोर उपाययोजना अवलंबाव्यात. यामुळे नवीन अतिरेकी संघटना निर्माण होऊ शकणार नाही, असे प्रतिपादन गृहमंत्री अमित शाह यांनी केले. ते येथे राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) आयोजित केलेल्या दोन दिवसीय दहशतवादविरोधी परिषदेत राज्ये आणि केंद्राच्या विविध संस्थांना संबोधित करीत होते. या परिषदेला गृह राज्यमंत्री निशिथ प्रामाणिक, गृह सचिव, इंटेलिजन्स ब्युरोचे संचालक, एनआयएचे महासंचालक, तसेच केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाचे महासंचालक, राज्य पोलिस प्रमुख, केंद्र आणि राज्य सरकारचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
अमित शाह म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली केंद्र आणि राज्य सरकारांनी गेल्या नऊ वर्षांत देशातील सर्व प्रकारच्या दहशतवादाला पायबंद घातला आहे. आपल्याला केवळ दहशतवादाशी लढायचे नाही, तर त्याची संपूर्ण पाळेमुळे नष्ट करायची आहेत. यासाठी आपण सर्वांनी एक होऊन काम केले पाहिजे. एनआयए, दहशतवादविरोधी पथक आणि विशेष कृती दल यांचे काम केवळ तपासापुरते मर्यादित न राहता त्यांनी चौकटीबाहेरचा विचार करून दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी कठोर पावले उचलली पाहिजेत.
दहशतवादाविरुद्धच्या लढाईसाठी जागतिक स्तरापासून तळागाळापर्यंत सहकार्य आवश्यक आहे, ज्यामध्ये देशातील विविध राज्यांचा तसेच आंतरराष्ट्रीय सहकार्याचा समावेश आहे. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारने क्रिप्टो, हवाला, दहशतवादी-निधी, संघटित गुन्हेगारी सिंडिकेट आणि नार्को-टेरर लिंक याविरुद्ध कठोर पावले उचलली आहेत. त्याचे खूप चांगले परिणाम मिळाले आहेत, परंतु अजूनही बरेच काही करायचे आहे. यावेळी अमित यांनी एनआयए अधिकार्यांना उत्कृष्ट सेवेसाठी पदके प्रदान केली.