किमान तापमान : 30.23° C
कमाल तापमान : 30.23° C
तापमान विवरण : clear sky
आद्रता : 59 %
वायू वेग : 4.02 Mps
स्थळ : Mumbai, IN
30.23° C
27.39°C - 30.57°C
sky is clear28.14°C - 31.11°C
sky is clear28.47°C - 30.63°C
scattered clouds28.04°C - 30.14°C
sky is clear27.8°C - 30.07°C
sky is clear28.08°C - 30.2°C
sky is clear-आप पुन्हा जाणार सुप्रीम कोर्टात,
नवी दिल्ली, (१२ ऑगस्ट) – दिल्ली सेवा विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहात मंजूर झाल्यानंतर, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही आज त्यावर आपली मोहर उमटवली आहे. यामुळे १९ मे रोजी जारी करण्यात आलेल्या अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर झाले. यापूर्वी दिल्लीतील केजरीवाल सरकारने या अध्यादेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. आता ते सुधारित कायद्यालाही आव्हान देणार आहेत.
नुकत्याच सूप वाजलेल्या संसदेच्या अधिवेशनात दिल्ली सेवा विधेयक मांडण्यात आले होते. हे विधेयक ३ ऑगस्ट रोजी लोकसभेत आणि नंतर राज्यसभेत ते मंजूर करण्यात आले. राज्यसभेत विधेयक मंजूर झाल्यानंतर मु‘यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी हा भारतीय लोकशाहीसाठी काळा दिवस असल्याचे म्हटले होते.
काय आहे अध्यादेश?
नव्या कायद्याद्वारे केंद्राने राष्ट्रीय राजधानी नागरी सेवा प्राधिकरण निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्राधिकरणाचे प्रमुख मु‘यमंत्री असतील तसेच त्यात मु‘य सचिव आणि गृह विभागाच्या प्रधान सचिवांचा समावेश असेल. या प्राधिकरणाच्या माध्यमातून नायब राज्यपालांकडे प्रशासकीय अधिकार्यांच्या नियुक्त्या आणि बदल्यांची फाईल देण्यात येईल.