किमान तापमान : 27.77° C
कमाल तापमान : 27.99° C
तापमान विवरण : clear sky
आद्रता : 78 %
वायू वेग : 3.43 Mps
स्थळ : Mumbai, IN
27.99° C
27.41°C - 30.59°C
sky is clear27.68°C - 30.66°C
sky is clear27.95°C - 30.89°C
sky is clear28.22°C - 30.48°C
few clouds27.91°C - 30.08°C
sky is clear27.65°C - 29.6°C
few clouds-एकूण अण्वस्त्रांच्या संख्येतही समोर,
नवी दिल्ली, (१२ जून) – विदेशी कर्जात आकंठ बुडालेल्या, देशवासीयांना अन्नासाठी मारामारी करण्यास भाग पाडणार्या, विदेशी चलनवाढीसाठी जगभर भटकणार्या पाकिस्तानने आपल्याजवळ अधिक अण्वस्त्रे बाळगल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. उल्लेखनीय म्हणजे दहशतवादाला खुले समर्थन देणारा हा देश सध्या भारतापेक्षा सहा अणुबॉम्ब बाळगून असल्याचे जगातील अण्वस्त्रांच्या निर्मितीवर लक्ष ठेवणारी संस्था द स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूटने (सिप्री) आपल्या वार्षिक अहवालात नमूद केले आहे.
मागील वर्षभरापासून संपूर्ण पाकिस्तानात दिवाळखोरीचे चित्र आहे. देशातील लोकांना दोन वेळच्या जेवणासाठी अन्नधान्याची सोय नसणे आणि अंडी, दूध, बटाटे, कांदे अशा दैनंदिन गरजेच्या वस्तू मिळविण्यासाठी पाकिस्तानी नागरिक कित्येक तास रांगांमध्ये असल्याचे अख्ख्या जगाने पाहिले. कित्येक महिन्यांपासून सरकारी तिजोरीत काही डॉलर्सच शिल्लक आहेत. एक-दोन अब्ज डॉलर्स कर्ज मिळविण्यासाठी पाकिस्तान अनेक दिवसांपासून जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी अशा आंतरराष्ट्रीय संस्थांसमोर हात जोडत असतानाच आज सोमवारी अचानक या देशाच्या संरक्षण क्षमतेबाबत संपूर्ण जगाला बुचकळ्यात टाकणारी माहिती समोर आली. सिप्रीनुसार, २०२२ मध्ये पाकिस्तानजवळ एकूण १६५ अण्वस्त्र होते. २०२३ मध्ये अर्थात एका वर्षात ही संख्या १७० वर पोहोचली. दुसरीकडे २०२२ मध्ये भारताजवळ १६० अण्वस्त्रे होती. याच कालावधीत भारताने त्यात चारची वाढ केल्याने एकूण आकडा १६४ वर पोहोचला.
गवत खा, पण अणुबॉम्ब बनवा
सिप्रीने अहवालात म्हटले की, पाकिस्तानजवळ २०२२ साली भारतापेक्षा पाच अणुबॉम्ब जास्त होते. यंदा २०२३ मध्ये भारत हा पाकिस्तानपेक्षा सहा अणुबॉम्बने मागे आहे. निश्चितच पाकिस्तानचा कंगालपणा पाहता आणि सिप्रीची आकडेवारी पाहता जगभरातील आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांसह संरक्षण क्षेत्रातील जाणकारांनी चक्क आश्चर्य व्यक्त करत प्रश्नही उपस्थित केले आहे. त्या प्रश्नाचे उत्तर १९७१ मधील युद्धात दडलेले असल्याचे सांगण्यात येते. भारतासोबत युद्ध हरल्यानंतर तत्कालीन पंतप्रधान जुल्फिकार अली भुट्टो यांनी अण्वस्त्रे बनविण्याचा दृढ संकल्प केला होता. आम्हाला गवत खावे लागले तरी चालेल. परंतु, पाकिस्तान अणुबॉम्ब बनविणारच. त्यांची ती भविष्यवाणी ५० वर्षांनंतर सत्यात उतरत असल्याचेही संरक्षण तज्ज्ञांनी म्हटले आहे. दरम्यान, कर्जात आकंठ बुडालेल्या पाकिस्तानने ९ जून रोजी वार्षिक अंदाजपत्रकात (२०२३-२४) मागील वर्षाच्या तुलनेत १५.५ टक्क्यांची वाढ केली आहे. आता संरक्षणासाठी १.८० ट्रिलियन पाकिस्तानी रुपयाची तरतूद केली आहे, हे विशेष.