किमान तापमान : 27.95° C
कमाल तापमान : 29.31° C
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 75 %
वायू वेग : 2.2 Mps
स्थळ : Mumbai, IN
29.31° C
28.07°C - 29.99°C
sky is clear27.55°C - 29.75°C
sky is clear27.8°C - 29.35°C
sky is clear27.61°C - 29.35°C
sky is clear27.9°C - 29.47°C
sky is clear27.92°C - 29.52°C
scattered clouds– बँका आता फायद्यात,
नवी दिल्ली, (०१ जुलै) – मोदी सरकारच्या ठोस प्रयत्नांमुळे भारतीय अर्थव्यवस्था आता बँका आणि कॉर्पोरेट्सच्या दुहेरी ताळेबंद समस्येतून बाहेर पडली आहे, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री निर्मला सीतारामन् यांनी शनिवारी केले. २०२२-२३ मध्ये सार्वजनिक बँकांचा फायदा वाढून तो १.०४ लाख कोटी रुपये झाला. २०१४ च्या तुलनेत हा फायदा तिप्पट आहे, असे सीतारामन् यांनी पंजाब अॅण्ड सिंध बँकेच्या येथील कॉर्पोरेट कार्यालयाचे उद्घाटन करताना सांगितले.
दुहेरी ताळेबंद हे एकाचवेळी बँका आणि सहकार क्षेत्राच्या बिघडलेली आर्थिक परिस्थिती संदर्भित करतो. सरकारच्या विविध उपक‘मांचा परिणाम म्हणून मला हे सांगायला अत्यंत आनंद होत आहे की, दुहेरी ताळेबंदाची समस्या दूर झाली आहे, जसे रिझर्व्ह बँकेने निरीक्षण केले की, हा दुहेरी ताळेबंदाचा फायदा आहे, ज्याचा फायदा अर्थव्यवस्थेला आहे, असे सीतारामन् म्हणाल्या.
दुहेरी ताळेबंद हा शब्द दीर्घ काळानंतर ऐकला आहे. रिझर्व्ह बँकेच्या म्हणण्यानुसार आता भारतीय अर्थव्यवस्थेला दुहेरी ताळेबंदाचा फायदा होत आहे. मोदी सरकारने २०१४ पासून घेतलेल्या विविध उपक‘मांमुळे सार्वजनिक बँकांची कामगिरी उंचावली आहे. मालमत्तेवर परतावा, निव्वळ व्याज मार्जिन आणि प्रोव्हिजनिंग कव्हरेज रेशो यासार‘या सर्व गंभीर बाबींमध्ये सुधारणा झाली आहे, असे सीतारामन् यांनी सांगितले.