किमान तापमान : 29.12° C
कमाल तापमान : 29.37° C
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 79 %
वायू वेग : 3.59 Mps
स्थळ : Mumbai, IN
29.12° C
28.79°C - 30.56°C
sky is clear28.15°C - 30.49°C
sky is clear28°C - 30.33°C
sky is clear27.64°C - 29.82°C
sky is clear27.9°C - 30.46°C
sky is clear28.28°C - 30.44°C
broken clouds– गृहमंत्री अमित शाह यांची वेदना,
नवी दिल्ली, (१४ ऑगस्ट) – धर्माच्या आधारावर झालेली देशाची फाळणी हा इतिहासातील एक काळा अध्याय आहे. अनेक लोक अजूनही १९४७ च्या भीषण घटनेला सामोरे जात आहेत. फाळणीची देशाला फार मोठी किंमत चुकवावी लागली, अशी वेदना फाळणीच्या वेळी ज्यांनी आपले प्राण गमावले त्यांना श्रद्धांजली अर्पण करताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सोमवारी व्यक्त केली.
१९४७ मध्ये धर्माच्या आधारावर झालेली देशाची फाळणी हा इतिहासातील काळा अध्याय आहे. त्यातून निर्माण झालेल्या द्वेषाने लाखो लोक मारले गेले आणि करोडो लोक विस्थापित झाले. याची मोठी किंमत देशाला चुकवावी लागली आणि आजही अनेकांना या भीषणतेचा सामना करावा लागत आहे. आज, ‘विभाजन विभीषिका स्मृतिदिना’निमित्त, मी त्या सर्व लोकांना श्रद्धांजली वाहतो, ज्यांनी फाळणीमुळे आपले प्राण आणि कुटुंबातील सदस्यांना गमावले, असे अमित शाह ‘एक्स’ पूर्वीचे ट्विटरवर, ‘पार्टिशनहॉरररिमेम्बर्सडे’ हॅशटॅगसह हिंदीत म्हणाले.
देशाच्या फाळणीच्या वेळी ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, त्यांच्या स्मरणार्थ मोदी सरकार २०२१ पासून १४ ऑगस्ट हा दिवस ‘विभाजन विभीषिका स्मृतिदिन’ म्हणून पाळत आहे. १९४७ मध्ये भारताच्या फाळणीनंतर पाकिस्तान मुस्लिम देश म्हणून उदयाला आला. त्यावेळी कोट्यवधी लोक विस्थापित झाले आणि त्यानंतरच्या दंगलीत लाखो लोक मारले गेले.