किमान तापमान : 28.98° C
कमाल तापमान : 30.99° C
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 79 %
वायू वेग : 2.84 Mps
स्थळ : Mumbai, IN
30.99° C
28.55°C - 31.47°C
overcast clouds28.21°C - 30.3°C
overcast clouds28.45°C - 29.99°C
scattered clouds28.53°C - 29.71°C
broken clouds28.57°C - 29.92°C
light rain28.61°C - 30.12°C
light rain-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘मन की बात’मध्ये चीनवर हल्ला,
नवी दिल्ली, २८ जून – भारताच्या भूभागावर डोळा ठेवणार्यांना लडाखमध्ये चोख प्रत्युत्तर देण्यात आले. देशाच्या स्वाभिमानाला धक्का लागू देणार नाही, हे आपल्या वीर सैनिकांनी दाखवून दिले आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्व लडाखमध्ये झालेल्या संघर्षानंतर ‘मन की बात’मध्ये म्हटले आहे. या मुद्यावर कॉंग्रेस सातत्याने केंद्र सरकारवर हल्ले करीत आहे, हे महत्त्वाचे.
गलवान खोर्यात चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीसोबत झालेल्या संघर्षात हौतात्म्य पत्करणार्या २० जवानांना श्रद्धांजली अर्पण करताना, देशाच्या स्वाभिमानाला धक्का लागणारी कोणतीही आगळीक खपवून घेतली जाणार नाही, असे या वीर जवानांनी दाखवून दिले, असे ते म्हणाले.
भारतीय जमिनीवर डोळा ठेवणार्यांना लडाखमध्ये तडाखेबंद प्रत्युत्तर देण्यात आले. भारत मैत्रीभावनेचा सन्मान ठेवतो. मात्र, कोणत्याही दुःसाहसाला चोख प्रत्युत्तर देण्याची क्षमताही या देशात आहे. हे प्रत्युत्तर देताना मागेपुढे पाहिले जाणार नाही, असे त्यांनी चीनचे नाव न घेता सांगितले.
स्थानिक पातळीवर तयार झालेल्या उत्पादनांचा वापर करण्यावर जोर देत ते म्हणाले की, ‘लोकल फॉर व्होकल’ हे एक देश सशक्त करण्याचे आणि देशसेवेचे माध्यम आहे. आत्मनिर्भर होणे हे भारताचे लक्ष्य आहे. विश्वास आणि मैत्री ही भारताची परंपरा आहे आणि बंधुत्व हा देशाचा आत्मा आहे. या मूल्यांनीच आपला देश समोर जात राहील, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
कमकुवत असलेली व्यक्ती शिक्षणाचा वापर संघर्षाचा प्रसार करण्यासाठी वापरते, इतरांना त्रास देण्यासाठी संपत्ती आणि शक्ती मिळवतो, तर एक सद्गृहस्थ शिक्षणाचा वापर ज्ञान वाढवण्यासाठी, संपत्तीचा वापर मदतीसाठी आणि शक्तीचा वापर संरक्षणासाठी करतो, असा एक जुना दाखला त्यांनी यावेळी दिला. भारत शक्तीचा वापर चांगल्या गोष्टींसाठी करतो, असेही त्यांनी सांगितले.
आत्मनिर्भर भारत हीच शहीदांना श्रद्धांजली
गलवान खोर्यात शहीद झालेल्या जवानांना आत्मनिर्भर भारत हीच खरी श्रद्धांजली ठरेल, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. देशाच्या सीमांचे संरक्षण करण्यासाठी आपण आपली क्षमता वाढवणे आवश्यक आहे. सत्य आणि गहन अर्थाने आत्मनिर्भर भारत शहीदांना श्रद्धांजली ठरेल.
पूर्व लडाखमध्ये झालेला संघर्ष पाहू जाता केवळ स्थानिक उत्पादने वापरण्याचा निर्धार केला, असे पत्र आसाममधील एका महिलेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवले आहे. या महिलेचा उल्लेखही त्यांनी आपल्या भाषणामध्ये केला. या अर्थाचा संदेश देशातील प्रत्येक कोपर्यातून प्राप्त होत आहे, असेही त्यांनी सांगितले.
संरक्षण, तंत्रज्ञान क्षेत्रात स्वयंपूर्णतेच्या दिशेने
आणखी एका पत्राचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की, विविध आयुधनिर्माण कारखान्यांच्या मदतीने देश स्वातंत्र्यापूर्वी संरक्षण क्षेत्रात कित्येक देशांच्या समोर होता. आपल्या मागे असलेले कित्येक देश आज संरक्षण क्षेत्रात आपल्या समोर गेले आहेत.
मागील अनुभव लक्षात घेता संरक्षण क्षेत्रात आपण मेहनत घेणे आवश्यक होते, पण तसे प्रयत्नच झाले नाहीत, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. परंतु, आज संरक्षण आणि तंत्रज्ञान क्षेत्रात भारत आघाडी घेण्याचा प्रयत्न करीत आहे. या क्षेत्रात आत्मनिर्भर होण्याच्या दिशेने आपण मोठे पाऊल उचलले आहे, असे त्यांनी सांगितले.