|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 05:58 | सूर्यास्त : 18:47
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 27.46° C

कमाल तापमान : 28.99° C

तापमान विवरण : few clouds

आद्रता : 79 %

वायू वेग : 1.3 Mps

स्थळ : Mumbai, IN

28.99° C

Weather Forecast for
Wednesday, 08 May

28.2°C - 30.23°C

sky is clear
Weather Forecast for
Thursday, 09 May

27.6°C - 29.81°C

sky is clear
Weather Forecast for
Friday, 10 May

27.47°C - 29.9°C

sky is clear
Weather Forecast for
Saturday, 11 May

27.78°C - 30.21°C

sky is clear
Weather Forecast for
Sunday, 12 May

27.88°C - 29.97°C

scattered clouds
Weather Forecast for
Monday, 13 May

28.06°C - 30.31°C

scattered clouds
Home » अर्थ, राष्ट्रीय » देशाने वाईट काळ मागे सोडला

देशाने वाईट काळ मागे सोडला

– आरबीआय गव्हर्नर दास यांचे प्रतिपादन,
नवी दिल्ली, (१८ मार्च) – देशातील महागाईवरून विरोधक केंद्रातील भाजपा सरकारवर सातत्याने टीका करीत असतात. यातच रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी देशातील महागाईबाबत मोठा दावा केला आहे. भारताने महागाईचा वाईट काळ मागे सोडला आहे. आपली अर्थव्यवस्था स्थिर आहे, असे ते म्हणाले. भारताचे परदेशी कर्ज मर्यादेत आहे आणि डॉलरचा भाव वाढल्याने भारतावर कोणतीही अडचण येणार नाही. नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑर्गने चालू वर्षात 7 टक्के आणि पुढच्या वर्षी 6.5 टक्के वाढीचा अंदाज व्यक्त केला आहे. चालू वर्षातील वाढ जगातील प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये सर्वाधिक असेल.
डॉलरच्या मूल्यवृद्धीमुळे उच्च परकीय कर्ज असलेल्या देशांना मदत करण्यासाठी आरबीआय गव्हर्नरने जी-20 द्वारे समन्वित प्रयत्न करण्याचे आवाहन केले, असे दास यांनी सांगितले. जी-20 देशांनी हवामान बदलामुळे सर्वाधिक प्रभावित झालेल्या देशांना युद्धपातळीवर वित्तपुरवठा केला पाहिजे. कोरोना महामारी, युक्रेनमधील युद्ध आणि जगभरातील बँकांनी चलनविषयक धोरण कडक केल्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेला अनेक धक्के बसले. अशा परिस्थितीतही भारतीय अर्थव्यवस्था स्थिर राहिली आणि ती सर्वांत वेगाने वाढणारी असेल, अशी अपेक्षा आहे. अमेरिकेत सध्या बँकिंग क्षेत्रावर मोठे संकट आले आहे. यावर दास म्हणाले की, अमेरिकेत सुरू असलेले बँकिंग संकट हे स्पष्टपणे दर्शवते की, खाजगी कि‘प्टोकरन्सी आर्थिक व्यवस्थेसाठी कसा धोका निर्माण करू शकते. जास्त ठेवी आणि कर्ज वाढ ही बँकिंग व्यवस्थेसाठी चांगली गोष्ट नाही, असेही ते म्हणाले. गव्हर्नर शक्तिकांत दास यांना 2023 या वर्षासाठी गव्हर्नर ऑफ द इयर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे, हे येथे उल्लेखनीय.

Posted by : | on : 18 Mar 2023
Filed under : अर्थ, राष्ट्रीय
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g