किमान तापमान : 27.86° C
कमाल तापमान : 28.61° C
तापमान विवरण : clear sky
आद्रता : 74 %
वायू वेग : 2.53 Mps
स्थळ : Mumbai, IN
28.61° C
27.51°C - 30.55°C
sky is clear28.01°C - 30.97°C
sky is clear28.26°C - 30.45°C
scattered clouds27.82°C - 30.02°C
sky is clear27.66°C - 29.83°C
sky is clear27.67°C - 29.81°C
light rainनवी दिल्ली, (१२ मे) – ‘द केरळ स्टोरी’ चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याच्या विरोधात निर्मात्यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने पश्चिम बंगाल, तामिळनाडू सरकारकडे उत्तर मागितले.सर्वोच्च न्यायालयाने दोन्ही राज्य सरकारांना फटकारले आणि ‘द केरळ स्टोरी’ हा चित्रपट देशभरात दाखवला जात असताना त्याच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याचे कारण काय, अशी विचारणा केली. सुप्रीम कोर्टाने तामिळनाडू सरकारला ‘द केरळ स्टोरी’ चित्रपट दाखवणार्या चित्रपटगृहांना सुरक्षा पुरवण्यासाठी काय पावले उचलली आहेत याची माहिती देण्यास सांगितले.
उगख चंद्रचूड म्हणले की, संपूर्ण देशात चित्रपट प्रदर्शित होत असताना पश्चिम बंगालमध्ये चित्रपट चांगला की वाईट हे लोकांना ठरवू दयावे. यासोबतच सर्वोच्च न्यायालयाने पश्चिम बंगाल सरकारला नोटीस बजावून उत्तर मागितले आहे. राज्यात चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याच्या पश्चिम बंगाल सरकारच्या निर्णयाला आव्हान देणार्या चित्रपटाच्या निर्मात्यांनी केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने पश्चिम बंगाल सरकारला नोटीस बजावली. यासोबतच सर्वोच्च न्यायालयाने तामिळनाडू सरकारलाही नोटीस बजावली आहे.