किमान तापमान : 28.56° C
कमाल तापमान : 30.18° C
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 81 %
वायू वेग : 2.22 Mps
स्थळ : Mumbai, IN
30.18° C
28.29°C - 30.99°C
overcast clouds28.45°C - 30.22°C
scattered clouds28.55°C - 29.67°C
broken clouds28.49°C - 30.14°C
broken clouds28.53°C - 30.25°C
light rain28.93°C - 29.93°C
light rainनवी दिल्ली, (३ मार्च) – नागालॅण्ड विधानसभा निवडणुकीत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पक्ष आठवले गटाचे दोन उमेदवार विजयी झाले. आमचा पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडीसोबत असल्यामुळे आम्ही सरकार स्थापण्यासाठी भाजपा आघाडीला पाठिंबा देऊ आणि सरकारमध्येही सामील होऊ, असे रामदास आठवले यांनी सांगितले. नागालॅण्डच्या नोकसेन विधानसभा मतदारसंघातून रिपब्लिकन पक्ष आठवले गटाचे वाई लिमा ओनन चंग तसेच तुएसांग विधानसभा मतदारसंघातून इम्तिचोबा विजयी झाले. राज्यातील अन्य तीन मतदारसंघात आठवले गटाचे उमेदवार दुसर्या स्थानावर असल्याचा दावाही गटाने केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कुशल नेतृत्वात आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या मार्गदर्शनात रालोआने विधानसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळवले, त्यामुळे राज्यातील जनतेचा मी आभारी आहे, असे आठवले म्हणाले. नागालॅण्डमधील रालोआच्या सरकारला आमचा पाठिंबा असून, सरकारमध्ये सहभागी होण्याबाबत मी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा तसेच संघटन महासचिव बी. एल. संतोष यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करणार आहे, असे आठवले यांनी सांगितले. राज्यातील विधानसभा निवडणुकीत आठवले गटाला मिळालेला विजय हा ऐतिहासिक असल्याचीं भावनाही त्यांनी व्यक्त केली.