किमान तापमान : 28.98° C
कमाल तापमान : 30.99° C
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 79 %
वायू वेग : 2.84 Mps
स्थळ : Mumbai, IN
30.99° C
28.55°C - 31.47°C
overcast clouds28.21°C - 30.54°C
overcast clouds28.45°C - 29.99°C
scattered clouds28.53°C - 29.71°C
broken clouds28.57°C - 29.92°C
light rain28.61°C - 30.12°C
light rainनवी दिल्ली, (२५ फेब्रुवारी ) – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बिहारमधील पश्चिम चंपारणमधील लॉरिया येथे जाहीर सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी नितीश कुमार यांच्यावर जोरदार निशाणा साधला. अमित शहा म्हणाले की, बिहारमध्ये आज जंगलराज सुरू आहे. नितीशकुमार विकासवादीतून संधीसाधू झाले. तसेच नितीश पंतप्रधान होण्याच्या इच्छेने बदलले आहेत, असेही ते म्हणाले.
गृहमंत्री म्हणाले, दर तीन वर्षांनी नितीश पंतप्रधान होण्याचे स्वप्न पाहतात. बिहारमधील पक्षांतर करणार्यांना शांत करावे लागेल. तसेच नितीश यांच्यासाठी भाजपचे दरवाजे बंद करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. नितीश यांच्यावर हल्लाबोल करताना अमित शाह यांनी जाहीर सभेत सांगितले की, ज्या काँग्रेसविरुद्ध ते आयुष्यभर लढले, ज्या जंगलराजविरुद्ध त्यांनी भाजपसोबत लढा दिला, त्या काँग्रेसने येथे एनडीएचे सरकार स्थापन केले. पण नंतर नितीशकुमार जंगलराजचे प्रणेते लालू प्रसाद यादव यांच्या मांडीवर जाऊन बसले. सत्तेसाठी सोनिया यांच्या पायाशी बसले. आयाराम गयाराम पुरे झाले, पण आता नितीशकुमारांसाठी भाजपचे दरवाजे बंद झाले आहेत, असे ते म्हणाले.
पुढे बोलताना अमित शहा म्हणाले, जेडीयू आणि आरजेडीची युती ही अपवित्र युती आहे. ते पाणी आणि तेलासारखे आहे. त्यात जेडीयूचे पाणी आणि आरजेडीचे तेल आहे. नितीश कुमार यांच्या पंतप्रधान होण्याच्या महत्त्वाकांक्षेने बिहारचे विभाजन केले आहे. बिहारमध्ये अराजकता आहे. गुन्हेगारी शिगेला पोहोचली आहे. कायदा व सुव्यवस्था कोलमडली आहे. बनावट दारू पिऊन लोक मरत आहेत आणि नितीश कुमार डोळे मिटून बसले आहेत, असेही गृहमंत्री यांनी सांगितले. ते म्हणाले, गेल्या विधानसभा निवडणुकीत जनतेने भाजपला सर्वात मोठा पक्ष बनवले. भाजपकडे जेडीयूपेक्षा जास्त जागा होत्या, पण त्यानंतरही पीएम मोदींनी आपले वचन पाळले आणि नितीश कुमार यांना मुख्यमंत्री केले. पण नितीश कुमार हे असे व्यक्ती आहेत, जे दर तीन वर्षांनी पंतप्रधान होण्याचे स्वप्न पाहतात.