किमान तापमान : 27.51° C
कमाल तापमान : 27.51° C
तापमान विवरण : clear sky
आद्रता : 67 %
वायू वेग : 2.77 Mps
स्थळ : Mumbai, IN
27.51° C
27.52°C - 30.55°C
sky is clear28.01°C - 30.97°C
sky is clear28.26°C - 30.45°C
scattered clouds27.82°C - 30.02°C
sky is clear27.66°C - 29.83°C
sky is clear27.67°C - 29.81°C
light rain– विरोधी एकजूट समोर नेण्याचा संकल्प,
नवी दिल्ली, (१२ एप्रिल) – बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी बुधवारी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या उपस्थितीत या पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खडगे यांची भेट घेतली आणि भाजपाच्या विरोधात विरोधकांची एकजूट समोर नेण्याचा संकल्प केला. पुढील लोकसभा निवडणुकीत भाजपाचा पराभव करण्यासाठी समविचारी विरोधी पक्ष एकत्रित व्यासपीठावर येणार असल्याची चर्चा असताना खडगे यांच्या निवासस्थानी ही बैठक झाली. ही ऐतिहासिक बैठक असून, आगामी निवडणुका एकत्र लढण्यासाठी सर्व पक्षांना एकत्र करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे खडगे यांनी सांगितले. पक्षांना एकत्र आणण्याची ही प्रकि‘या असून, विरोधकांची दृष्टी एकत्रितपणे विकसित केली जाईल, असे राहुल गांधी म्हणाले.
या वैचारिक लढाईत सर्व पक्षांना सोबत घेऊन चालणार आहोत. आम्ही संस्था आणि देशावरील हल्ल्याचा एकजुटीने सामना करू आणि त्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल उचलू, असे गांधी म्हणाले. अधिकाधिक विरोधी पक्षांना एकत्र करण्याचा प्रयत्न केला जाणार असून, याबाबत आम्ही एकत्रित प्रयत्न करणार असल्याचे नितीशकुमार यांनी सांगितले.
आम्ही संविधानाचे रक्षण करणार आहोत तसेच लोकशाही वाचवणार आहोत. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची राहुल गांधी यांनी भेट घेतली. एकत्रितपणे लोकांचा आवाज उठवून देशाला नवीन दिशा देण्याच्या आमच्या संकल्पाचा त्यांनी पुनरुच्चार केला, असे हिंदीतील ट्विट खडगे यांनी या भेटीनंतर केले.
खडगे यांच्या निवासस्थानी या नेत्यांनी दुपारचे जेवणही घेतले. यात जदयूचे अध्यक्ष लालनसिंह, बिहार काँग्रेसचे प्रमुख अखिलेश प्रसादसिंह, काँग्रेसचे नेते सलमान खुर्शीद आणि राजदचे नेते मनोज झा हेदेखील उपस्थित होते. जदयू, राजद आणि काँग्रेसने आघाडी तयार करीत बिहारमध्ये सत्ता स्थापन केली आहे.