किमान तापमान : 28.49° C
कमाल तापमान : 30.16° C
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 80 %
वायू वेग : 2.89 Mps
स्थळ : Mumbai, IN
30.16° C
28.65°C - 31.7°C
broken clouds28.44°C - 30.08°C
scattered clouds28.52°C - 29.63°C
broken clouds28.51°C - 29.93°C
overcast clouds28.43°C - 30.02°C
light rain28.59°C - 29.86°C
light rain– जी-२० देशांच्या संसदप्रमुखांच्या पी-२० परिषदेला प्रारंभ,
यशोभूमी (नवी दिल्ली), (१२ ऑक्टोबर) – जगातील सर्वच देशांना वातावरणातील बदलाच्या दुष्परिणामांचा फटका बसला आहे, या जागतिक संकटातून बाहेर येण्यासाठी पर्यावरणानुकूल जीवनशैलीचा अवलंब करण्याची आवश्यकता लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी गुरुवारी व्यक्त केली. जी-२० देशांतील संसदप्रमुखांच्या पी-२० बैठकीला आजपासून द्वारका परिसरातील नवनिर्मित इंडिया इंटरनॅशनल कन्व्हेंशन अॅण्ड एक्स्पो सेंटर यशोभूमी येथे प्रारंभ झाला. यात ‘पार्लमेंट फोरम ऑन लाईफ’ या विषयावरील पहिल्या सत्राचे उद्घाटन करताना बिर्ला बोलत होते. जी-२० देशातील संसदेचे प्रमुख या परिषदेला उपस्थित आहेत.
पर्यावरणानुकूल जीवनशैलीचा विचार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वप्रथम जगासमोर मांडला. मिशन लाईफ स्टाईल पर्यावरण संरक्षणाचा व्यापक दृष्टिकोन आहे, जो प्रत्येक व्यक्तीला आपल्या जीवनात रिड्युस, रियुज आणि रिसायकलिंगच्या व्यवहाराला प्रेरणा देतो. पर्यावरणाचे नुकसान होणार नाही, अशी जीवनशैली आणि दृष्टिकोन प्रत्येकाने आचरणात आणण्याची गरज आहे. ही आमच्या सगळ्यांंची व्यक्तिगत आणि सामूहिक जबाबदारी आहे. ‘लाईफ स्टाईल मिशन’ने आम्हाला जलवायू परिवर्तन, स्वास्थ्यसुरक्षा, खाद्यसुरक्षा, ऊर्जा सुरक्षासार‘या समस्यांतून बाहेर निघाण्याचा तसेच सातत्यपूर्ण विकासाचा मार्ग दाखवला आहे. त्यामुळे आज हा विचार हा वैश्विक आंदोलन झाला आहे. याचा आधार घेत जगातील अनेक देश आपली आर्थिक, सामाजिक आणि भौगोलिक गरज लक्षात घेत वेगवेगळे कायदे बनवत आहोत, असे बिर्ला म्हणाले.
पर्यावरणासाठी जीवनशैली या विषयावर आपल्या संसदेतही चर्चा झाली, कायदेही बनवण्यात आले, मात्र जलवायू परिवर्तनाच्या समस्येवर फक्त धोरण आखून आणि कायदे बनवून आम्ही मात करू शकत नाही. त्यासाठी प्रत्येकाने आपल्या जीवनशैलीत बदल करून सामूहिकपणे योगदान देण्याची गरज आहे, असे ते म्हणाले. जगातील सर्व देशांतील संसदेत मिशन लाईफस्टाईलवर चर्चा घडवून आणण्याचे आवाहन करीत बिर्ला म्हणाले, यामुळे या मिशनचा संदेश प्रत्येकाने आपल्या जीवनाचा हिस्सा बनवत त्याला जनआंदोलनाचे स्वरूप देत निरोगी आणि चांगले जग निर्माण करण्याचे उद्दिष्ट आपण गाठू शकू.