किमान तापमान : 26.99° C
कमाल तापमान : 27.58° C
तापमान विवरण : clear sky
आद्रता : 78 %
वायू वेग : 1.75 Mps
स्थळ : Mumbai, IN
26.99° C
26.99°C - 30.45°C
sky is clear27.3°C - 30.34°C
sky is clear27.48°C - 30.57°C
sky is clear28°C - 30.56°C
few clouds28°C - 30.08°C
sky is clear27.36°C - 29.66°C
few cloudsकेंद्रीय मंत्रिमंडळाचा महत्त्वाचा निर्णय,
नवी दिल्ली, १६ मार्च – देशातील पायाभूत सुविधांच्या विकासाला गती देण्यासाठी केंद्र सरकारने विकास वित्त संस्था स्थापन करण्याचा निर्णय आज मंगळवारी घेतला आहे. २० हजार कोटींच्या भांडवलातून या संस्थेची निर्मिती केली जाणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत यासंदर्भातील निर्णय घेण्यात आला. नॅशनल मीडिया सेंटरमध्ये आयोजित पत्रपरिषदेत अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांनी याबाबत माहिती दिली. अर्थमंत्रालयाच्या यासंदर्भातील प्रस्तावाला आज मंजुरी देण्यात आली. अर्थसंकल्पातूूून सरकारने देशातील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी अशी संस्था स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली होती. त्याची पूर्तता यानिमित्ताने होत आहे, असे सीतारामन् म्हणाल्या.
२० हजार कोटी रुपयांच्या भांडवलातून विकास वित्त संस्थेची स्थापना केली जाणार आहे. यासंदर्भात एक विधेयक लवकरच संसदेत मांडले जाणार आहे. संस्थेसाठी व्यावसायिक संचालक मंडळ स्थापन केले जाणार आहे. बाजार, विमा कंपन्यातून या नवीन संस्थेसाठी निधी उभारला जाणार आहे, असे त्यांनी जाहीर केले.
देशाच्या अपेक्षांची पूर्तता करण्यासाठी बँकांच्या विलीनीकरणाचा निर्णय घेण्यात आला, असे एका प्रश्नाचे उत्तर देताना त्यांनी स्पष्ट केले. सीतारामन् म्हणाल्या की, सगळ्याच बँकांचे खाजगीकरण केले जाणार नाही. देशातील सर्व बँका स्टेट बँक ऑफ इंडियाच्या तोडीच्या व्हाव्या म्हणून काही बँकांच्या विलीनीकरणाचा निर्णय घेण्यात आला आहे.
देशातील काही बँका चांगले काम करीत आहे, काहींचे काम ठिकठाक आहे. मात्र, काही बँकांची कामगिरी अतिशय निराशाजनक असल्यामुळे या बँकांना आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी बँकांच्या विलीनीकरणाचा निर्णय घेतला जात आहे. हा निर्णय घेताना कर्मचार्यांच्या हिताची काळजी घेतली जाईल, त्यांचे पगार आणि निवृत्ती वेतन यांचे कोणतेही नुकसान होऊ दिले जाणार नाही, असे त्या म्हणाल्या.