किमान तापमान : 30.23° C
कमाल तापमान : 30.23° C
तापमान विवरण : clear sky
आद्रता : 59 %
वायू वेग : 4.02 Mps
स्थळ : Mumbai, IN
30.23° C
27.39°C - 30.57°C
sky is clear28.14°C - 31.11°C
sky is clear28.47°C - 30.63°C
scattered clouds28.04°C - 30.14°C
sky is clear27.8°C - 30.07°C
sky is clear28.08°C - 30.2°C
sky is clear– आरबीआयची कारवाई,
नवी दिल्ली, (३१ जानेवारी) – पेटीएम या आघाडीच्या फिनटेक कंपनीवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पेटीएम पेमेंट्स बँकेला नवीन ग्राहक जोडण्यास बंदी घातली आहे.
हा निर्णय तात्काळ लागू करण्यात आला आहे. केंद्रीय बँकेने बुधवारी सांगितले की, बँक अनेक नियमांचे उल्लंघन करत आहे. लेखापरीक्षण अहवालात ही बाब समोर आली आहे. या बंदीनंतर ग्राहकांना त्यांच्या खात्यात पैसे जमा करता येणार नाहीत. तसेच वॉलेट, फास्टॅग आणि एनसीएमसी कार्ड देखील टॉपअप केले जाणार नाही, असे आरबीआयने म्हटले आहे. मात्र, ग्राहकांना पैसे काढण्याची परवानगी देण्यात आली आहे.
कोणत्याही प्रकारची ठेव स्वीकारली जाणार नाही
आरबीआयच्या म्हणण्यानुसार, पेटीएम पेमेंट्स बँकेने कोणत्याही ग्राहकाकडून पैसे जमा करू नयेत. २९ फेब्रुवारीनंतर कोणत्याही ग्राहकाच्या खात्यात कोणत्याही प्रकारची ठेव स्वीकारली जाणार नाही. हे पैसे वॉलेट, फास्टॅग किंवा इतर कोणत्याही प्रीपेड प्रणालीद्वारे घेतले असले तरीही. रिझर्व्ह बँकेने सांगितले की, बाह्य लेखापरीक्षकांच्या अहवालाच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे. या अहवालांवरून असे दिसून आले की बँक अनेक आर्थिक नियमांचे पालन करण्यात सातत्याने अपयशी ठरली आहे. याशिवाय अनेक प्रकारची अनियमितता आढळून आली. पेटीएम पेमेंट्स बँकेवरील या आरोपांची चौकशी सुरूच राहणार आहे.
ग्राहकांना त्यांचे पैसे काढता येणार आहेत
सध्या नवीन ग्राहक जोडू नयेत, अशा सूचना मध्यवर्ती बँकेने दिल्या. तसेच, ग्राहकाला त्याच्या खात्यातून पैसे काढण्याचे पूर्ण स्वातंत्र्य देण्यात आले आहे. ग्राहक त्यांच्या बचत, चालू, प्रीपेड, फास्टटॅग आणि नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड मधून कोणत्याही अडचणीशिवाय पैसे काढू शकतील.
पैसे ट्रान्सफर करण्यासाठी सर्व सुविधा द्याव्या लागतील
मध्यवर्ती बँकेने सर्व बँकिंग सेवा बंद करण्याच्या सूचना दिल्या असल्या तरी. पण, पैसे ट्रान्सफर करण्याची सुविधा द्यावी लागेल. यामध्ये एइपीएस, आयएमपीएस, बीबीपीओयु आणि युपीआय सुविधांचा समावेश आहे. याशिवाय आरबीआयने वन९७ कम्युनिकेशन आणि पेटीएम पेमेंट बँक सर्विसेस ली.ची नोडल खाती लवकरात लवकर बंद करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच, बँकेला सर्व व्यवहार आणि नोडल खाती सेटल करण्यासाठी १५ मार्चपर्यंत वेळ देण्यात आला आहे. यानंतर कोणताही व्यवहार स्वीकारला जाणार नाही.