किमान तापमान : 28.49° C
कमाल तापमान : 29.49° C
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 75 %
वायू वेग : 2.87 Mps
स्थळ : Mumbai, IN
29.49° C
27.97°C - 30.03°C
sky is clear27.6°C - 30.31°C
sky is clear27.65°C - 29.86°C
sky is clear27.57°C - 29.91°C
sky is clear28.23°C - 29.99°C
scattered clouds28.08°C - 29.83°C
broken clouds– रक्कम योग्य व्यक्तीला मिळण्यासाठी रिझर्व्ह बँकेचा विशेष उपक्रम,
मुंबई, (२७ जुलै) – बँकांमध्ये ५,७२९ कोटी रुपये जमा असून, या रकमेला कुणीच वाली नाही. गेल्या पाच वर्षांत विविध बचत खाती आणि एफडीमध्ये जमा केलेल्या पाच हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेचे दावेदार सापडत नाहीत. हे पैसे कुणाचे, हे शोधण्याचे काम सुरू आहे. रिझर्व्ह बँकेने ही रक्कम लवकरात लवकर निकाली काढण्यास सांगितले आहे. मागील पाच वर्षांत दावा न केलेल्या ठेवी लवकर निकाली काढण्यासाठी ठेवीदार शिक्षण आणि जागरुकता फंडातून एकूण ५,७२९ कोटी रुपये बँकांमध्ये हस्तांतरित करण्यात आले आहेत.
दावा न केलेल्या रक्कमा योग्य ठिकाणी पोहोचवण्यासाठी रिझर्व्ह बँकेने एक विशेष उपक‘म सुरू केला आहे. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी लोकसभेत सांगितले की, रिझर्व्ह बँकेने ठेवकर्ता शिक्षण आणि जागरुकता निधी योजना २०१४ (डीईए) अधिसूचित केली आहे. यात हक्क न ठेवलेल्या ठेवींच्या नियमांचा समावेश आहे आणि निधीच्या वापराच्या तपशील आहेत. या उपक‘मांतर्गत दावा न केलेल्या रकमेचे वाटप केले जाईल.
विविध बँकांनी दावेदार न सापडलेली रक्कम डीईएमध्ये जमा केली आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी ३१ मार्च २०२३ पर्यंत डीईएमध्ये ३६,१८५ कोटी रुपयांच्या हक्क नसलेल्या ठेवी जमा केल्या आहेत. मार्च २०१९ मध्ये ही रक्कम १५,०९० कोटी रुपये होती तर, खाजगी बँकांनी ३१ मार्च २०२३ पर्यंत डीईएमध्ये ६,०८७ कोटी रुपये जमा केले आहेत.