किमान तापमान : 30.16° C
कमाल तापमान : 33.38° C
तापमान विवरण : clear sky
आद्रता : 41 %
वायू वेग : 6.21 Mps
स्थळ : Mumbai, IN
33.38° C
29.18°C - 34.99°C
sky is clear29.02°C - 32.5°C
scattered clouds28.43°C - 31.89°C
sky is clear27.58°C - 30.78°C
few clouds27.35°C - 30.23°C
scattered clouds27.13°C - 30.31°C
few cloudsनवी दिल्ली, (२८ मार्च) – काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदी आडनावावरून केलेल्या अपमानजनक विधानामुळे देशातील समस्त ओबीसी समाजाचा अपमान झाला, असा आरोप करीत भाजपाच्या ओबीसी खासदारांनी मंगळवारी संसदभवनातून विजय चौकापर्यंत मोर्चा काढला.
राहुल गांधी यांनी ओबीसी समाजाची माफी मागावी, अशी मागणी या मोर्चात सहभागी भाजपा खासदार करत होते. सर्व चोर मोदी आडनावाचेच कसे असतात, असे विधान राहुल गांधी यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीतील प्रचारादरम्यान केले होते. या विधानामुळे राहुल गांधी यांच्यावर फौजदारी अवमानना खटला दाखल करण्यात आला होता. सूरतच्या न्यायालयाने या प्रकरणात राहुल गांधींना दोन वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. परिणामी त्यांना आपले लोकसभेचे सदस्यत्व गमवावे लागले.
राहुल गांधींनी आपल्या विधानातून पंतप्रधान मोदी यांचा नाही, तर देशातील ओबीसी समाजाचा अपमान केल्याचा आरोप भाजपाने केला आहे. हे प्रकरण लावून धरण्याचे भाजपाने ठरवले आहे. त्यामुळे येत्या ६ एप्रिलपासून १४ एप्रिलपर्यंत म्हणजे भाजपाच्या स्थापनादिनापासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त देशभर निदर्शने करण्याचे भाजपाने ठरवले आहे. त्याचप्रमाणे या काळात भाजपाने ओबीसी समाजाच्या कल्याणाच्या घेतलेल्या निर्णयाची माहितीही दिली जाणार आहे.